शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

खरिपावर मका-सोयाबीनची छाप, बाजरीचे क्षेत्र लाखाने घटले

By admin | Published: July 13, 2017 5:28 PM

पावसाने ओढ दिल्याने रखडल्या पेरण्या

पावसाने ओढ दिल्याने रखडल्या पेरण्यागणेश धुरीलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : खरीप हंगामात चालू वर्षात खरीप बाजरीचे क्षेत्र कमालीचे घटले असून, मका व सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. बाजरीचे ७५ हजार ते एक लाख हेक्टरच्या आसपास क्षेत्र घटून, त्याऐवजी मका पिकाचे ५० हजारावरून वाढत वाढत यावर्षी चक्क पावणेदोन लाख हेक्टरच्या आसपास क्षेत्र पोहोचले आहे. खरिपाच्या एकूण लागवडीतही सर्वाधिक पेरण्या मका पिकाच्या पेरण्या ८६ टक्के तर सोयाबीनच्या पेरण्या ६३ टक्के क्षेत्रावर झाल्या आहेत.११ जुलै अखेर खरीप हंगामाच्या ६ लाख ५२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख ६३ हजार ५६८ हेक्टर ( ४७.४४ टक्के) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. भात पिकाचे खरिपाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ६६ हजार ७०० असताना, प्रत्यक्षात १८ हजार ७२२ (२८ टक्के) हेक्टर क्षेत्रावर, ज्वारीचे ३९०० हेक्टर क्षेत्रापैकी १४५ हेक्टर (३.६३), बाजरी १ लाख ६२ हजार २०० हेक्टर क्षेत्रापैकी ७५ हजार ८५२ हेक्टर ( ४७.३४), नागलीचे ३५ हजार ३०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार ७०२ हेेक्टर (१३.३०) मका पिकाचे १ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात १ लाख ५० हजार ३१३ (८६. ८७) हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. खरीप तुरीचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र १० हजार ४०० हेक्टर असताना प्रत्यक्षात ५ हजार २०१ (४९ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उडीद पिकाचे १४ हजार ७०० हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात ७ हजार ५५९ हेक्टर क्षेत्रावर (५१ टक्के) भुईमूग पिकाचे ३१ हजार ३०० हेक्टर सरासरी लागवडीखालील क्षेत्र असताना प्रत्यक्षात १५ हजार ५७४ हेक्टर (१५१ टक्के) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन पिकाचे सरासरी लागवडीखालील ५७ हजार हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात ३६ हजार १६५ हेक्टर ( ६३.४३ टक्के) क्षेत्रावर सोयाबीन पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. जूनमध्ये दमदार हजेरी लावणार्‍या पावसाने गेल्या दोन आठवड्यांपासून दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. अजून आठवडाभर पाऊस झाला नाही, तर काही भागात दुबार पेरण्या करण्याचे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत. खरिपाच्या साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रात सर्वाधिक बाजरीचे अडीच ते पावणेतीन लाख हेक्टरचे क्षेत्र दीड लाखापर्यंत खाली आले आहे.