शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

काश्मीरला जाणारे मंत्री 'डरपोक', मणिशंकर अय्यर यांचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 09:41 IST

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केरळमध्ये एका जनसभेला संबोधित करताना भाजपाला देशद्रोही म्हटलं आहे.

तिरुअनंतपूरमः काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केरळमध्ये एका जनसभेला संबोधित करताना भाजपाला देशद्रोही म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याप्रकरणी मणिशंकर अय्यर यांनी भाजपावर हल्लाबोल केला. त्यांनी सरकारनं काश्मीरच्या दौऱ्यावर 36 मंत्र्यांना पाठवण्याच्या निर्णयावर टीका केली. भाजपाचे लोक हे दगाबाज आहेत. ते जनतेचे प्रतिनिधी नाहीत. सरकार काश्मीर खोऱ्यात 36 मंत्री पाठवणार होती. पण त्या 36 पैकी 31 मंत्री जम्मूला, तर फक्त पाच मंत्री काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हे लोक डरपोक आहेत, काश्मीर खोऱ्यातील जनतेच्या उद्रेकाची यांना भीती वाटत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरपासून लडाखला वेगळं करण्यात आलं आहे. काश्मीर खोऱ्यातील लोकांवर अत्याचार होत आहेत. चार हजार नेत्यांना तुरुंगात बंद करण्यात आलं आहे. देशात असे काही देशद्रोही आहेत, त्यांना आपण पहिल्यांदाच पाहतो आहोत. प्रत्येक समाजात काही विश्वासघातकी लोक असतात, असं म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन वर्षांपूर्वी ‘नीच’ असा उल्लेख केल्याने मणिशंकर अय्यर वादात सापडले होते. मणिशंकर अय्यर यांना वरील विधानामुळे काँग्रेसने निलंबित केले होते. पुढे 2018मध्ये त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यानंतर आता अय्यर यांनी मोदी यांचा उल्लेख देशाने पाहिलेला अत्यंत शिवराळ पंतप्रधान असा केला आहे.