शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

मणिशंकर अय्यर यांचे निलंबन काँग्रेसकडून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 02:08 IST

मोदींविषयी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त उद्गार काढल्याने माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांना काँग्रेसमधून निलंबित करण्याची केलेली कारवाई पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी रद्द केली आहे.मोदींविषयी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. अय्यर यांना काँग्रेसमधून निलंबित करण्याची केलेली कारवाई रद्द करण्याची पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने केलेली शिफारस राहुल गांधी मान्य केली. मणिशंकर अय्यर यांचे काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व गेल्या ७ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आले होते. मोदींबद्दल काढलेल्या वादग्रस्त उद्गारांबद्दल अय्यर यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या आधी मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह काही वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना आपल्या निवासस्थानी मेजवानीसाठी आमंत्रित केले होते त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपने गुजरात विधानसभा निवडणुक प्रचारामध्ये काँग्रेसविरोधात प्रचार करताना या प्रकरणाचा चलाखीने उपयोग करुन घेतला होता.‘हे' तर काँग्रेसचे नाटक : भाजपमणिशंकर अय्यर यांचे निलंबन हे काँग्रेसने केलेले नाटक होते. हे निलंबन रद्द केल्याने या नाटकाचा पर्दाफाश झाला आहे, अशी टीका भाजपने केली आहे. भाजपचे राष्टÑीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, नऊ महिन्यांपासून काँग्रेसचे हे नाटक चालू होते. गुजरातमधील जनता आणि मागासवर्गीयांचा अवमान करणारे विधान अय्यर यांनी राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरून केले होते का? असा सवालही त्यांनी केला आहे.सिद्धू यांच्यावरूनही निशाणा...अय्यर यांच्या समवेत संबित पात्रा यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावरूनही काँग्रेसवर निशाणा साधला. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेऊन आणि पाकव्याप्त काश्मीरच्या अध्यक्षांसोबत स्थानापन्न होऊन त्यांनी भारतीय राजनैतिकतेला नुकसान पोहोचवले. राहुल गांधी यांनी याचे उत्तर द्यावे. सर्जिकल स्ट्राईकबाबत पुरावे मागणाºया काँग्रेसच्या एका मंत्र्याने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतली. यातून काँग्रेसचा दुटप्पीपणा उघड होतो.

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा