शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
2
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
3
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
4
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...
5
एका शेअरवर ₹११७ चा डिविडेंड देतेय कंपनी, रेकॉर्ड डेट आता जास्त दूर नाही; पाहा कोणता आहे शेअर?
6
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
7
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
8
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
9
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
10
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
11
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
12
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
13
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
14
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
15
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
16
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
17
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
18
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
19
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
20
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?

रा. स्व. संघाच्या बैठकीत मणिपूर, बांग्लादेशसह भाषावाद प्रमुख लक्ष्य; बंगळुरूत अ. भा. प्रतिनिधी सभेचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:19 IST

संघाच्या प्रणालीमध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या या वार्षिक प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आलेल्या संघाच्या वार्षिक कार्यवृत्तावर चर्चा होणार असून, वार्षिक अहवालात उत्तर-दक्षिण भाषा भेद, मणिपूरमधील स्थिती, बांगला देशातील हिंदू आणि महाकुंभच्या यशाबद्दल राज्य व केंद्र सरकारचे अभिनंदन असे विषय मांडण्यात आले.

बंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची तीन दिवसीय वार्षिक बैठक शुक्रवारी येथे प्रारंभ झाली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी या सभेचे उद्घाटन केले. यावेळी सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी होसबळे यांनी मांडलेल्या वार्षिक अहवालात मणिपूरसह उत्तर-दक्षिण भेद, बांगलादेशातील हिंदूंची स्थिती आणि महाकुंभची यशस्वी सांगता या प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

 संघाच्या प्रणालीमध्ये निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या या वार्षिक प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आलेल्या संघाच्या वार्षिक कार्यवृत्तावर चर्चा होणार असून, वार्षिक अहवालात उत्तर-दक्षिण भाषा भेद, मणिपूरमधील स्थिती, बांगला देशातील हिंदू आणि महाकुंभच्या यशाबद्दल राज्य व केंद्र सरकारचे अभिनंदन असे विषय मांडण्यात आले.

संघाच्या कार्याची शताब्दीयंदाच्या विजयादशमीला संघाच्या कार्याची शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या दृष्टीने २०२५-२६ शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, त्याची रूपरेषा या सभेत तयार केली जाणार आहे.

डॉ. मनमोहनसिंग, हुसेन यांना श्रद्धांजलीसह सरकार्यवाह सी. आर. मुकुंद यांनी पहिल्या दिवशीचे सत्र पार पडल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना शुक्रवारी प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, प्रीतीश नंदी, एस. एम. कृष्णा, राम जन्मभूमीचे ट्रस्टी कामेश्वर चौपाल, तुलसी गौडा, शंकर तत्ववादी आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचे सांगितले.

मणिपूरमध्ये परिस्थिती सुधारतेयसहसरकार्यवाह मुकुंद यांनी मणिपूरमध्ये २० महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर वार्षिक अहवालात असलेल्या उल्लेखांवर भाष्य केले. ही स्थिती असली तरी केंद्र सरकार आणि मणिपूरच्या जनतेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या कार्यामुळे खूप मोठी आशा निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

मातृभाषेतील शिक्षणालाच महत्त्वभाषेच्या निमित्ताने उत्तर-दक्षिण वाद वाढवण्याचे प्रयत्न राजकारणात होत आहेत. मात्र रा. स्व. संघ प्रादेशिक भाषांनाच महत्त्व देतो. मातृभाषेतील शिक्षणालाच संघाने महत्त्व दिले असल्याचे मुकुंद यांनी नमूद केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBengaluruबेंगळूर