शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

Manipur: मणिपूरमध्ये पुन्हा भाजप; बीरेन सिंह यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 16:31 IST

Manipur: एन बिरेन सिंग यांच्यासह इतर पाच आमदारांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली. 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत इतर पक्षांच्या पाठिंब्यानंतर भाजप सरकारचे संख्याबळ 41 झाले आहे.

इंफाळ: मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग सोमवारी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. इंफाळमध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मणिपूर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एन बिरेन सिंह यांची एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. सिंह यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्यानंतर केंद्रीय निरीक्षक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा एक अतिशय चांगला निर्णय असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, यामुळे मणिपूरमध्ये एक स्थिर आणि जबाबदार सरकार आले आहे, असा विश्वासही व्यक्त केला. 

5 आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलीएन बिरेन सिंग यांच्याशिवाय नेमचा किपगेन, वाय. खेमचंद सिंग, ठाकूर. बिस्वजित सिंह, अवांगबू न्यूमाई आणि गोविंददास कोन्थौजम या पाच आमदारांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. बिरेन सिंग यांची 32 आमदारांसह भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. यानंतर मणिपूरचे राज्यपाल एल गणेशन यांनी बीरेन सिंग यांना पुढील सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले होते.

भाजपकडे 41 जणांचे संख्याबळराजभवनच्या निवेदनात म्हटले आहे की, जनता दल, दोन राजकीय पक्षांच्या सहा सदस्यांनी, कुकी पीपल्स अलायन्सचे दोन सदस्य आणि एक अपक्ष यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, त्यांची पाठिंब्याची पत्रेही राज्यपालांना सादर करण्यात आली आहेत. यासह, 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचे संख्याबळ 41 झाले आहे. कालच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती की, एन बिरेन सिंग मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील.

भाजप दुसऱ्यांदा सत्तेत 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत भाजपने 32 जागा जिंकून सत्तेत पुनरागमन केले. काँग्रेसच्या वाट्याला फक्त पाच जागा आल्या. याशिवाय 7 जागा NPP, 7 NPF आणि 11 जागा इतरांना गेल्या आहेत. 2017 च्या निवडणुकीत, भाजप हा काँग्रेसनंतरचा दुसरा पक्ष होता, तरीही त्यांनी काँग्रेसच्या निवडून आलेल्या सदस्यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले आणि एन बीरेन सिंह राज्याचे मुख्यमंत्री झाले. काँग्रेसच्या 28 च्या तुलनेत केवळ 21 जागा असूनही 2017 मध्ये भाजपला दोन स्थानिक पक्ष, NPP आणि NPF- सोबत सरकार स्थापन करण्यात यश आले.

टॅग्स :Manipur Assembly Election 2022मणिपूर विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा