शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

मणिपूरमध्ये परवानगी नाकारली, आता राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' कोठून सुरू होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 3:51 PM

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा येत्या 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमध्ये परवानगी मिळालेली नाही. एन विरेन सिंग यांच्या सरकारने इम्फाळमधील पॅलेस मैदानावर यात्रेला परवानगी नाकारली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता ही यात्रा कुठून सुरू करणार? याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. काँग्रेसने मणिपूर सरकारच्या या निर्णयाला दुर्दैवी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा येत्या 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

मणिपूर सरकारने परवानगी दिली नसल्यामुळे काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की, मणिपूर सरकारचा हा निर्णय दुर्दैवी आहे. मणिपूर काँग्रेस अध्यक्षांनी आठवड्यापूर्वी मुख्य सचिवांना परवानगीसाठी पत्र दिले होते. 5 दिवसांत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले होते. 3 दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष के मेघनाचंद्र हे मुख्य सचिवांना भेटायला गेले होते. पण आज आम्हाला माहिती मिळाली की पॅलेस ग्राउंड इंफाळ येथे परवानगी रद्द करण्यात आली आहे.

याचबरोबर, केसी वेणुगोपाल म्हणाले की, आज म्हणजेच बुधवारी सकाळी आमचे माजी मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांना भेटायला गेले आणि त्यांना विनंती केली, पण त्यांनी नकार दिला. मी मणिपूर, आसाम आणि नागालँडला भेट दिली आहे. त्यामुळे मी सांगू शकतो की तेथे यात्रेची लाट आहे. ही राजकीय यात्रा नाही. यात्रा यशस्वीतेसाठी लोक उभे राहिले आहेत, ती नक्कीच यशस्वी होईल. आम्ही फक्त मणिपूरपासून सुरुवात करू, आम्ही दुसरे ठिकाण सांगितले आहे. तेथील मुख्यमंत्र्यांनी आमचे माजी मुख्यमंत्री इबोबी सिंग यांना तोंडी संमती दिली आहे, असे केसी वेणुगोपाल यांनी सांगितले.

6200 किलोमीटरची यात्राराहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई अशी असणार आहे. राहुल गांधी 67 दिवसांत 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतून 6200 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात मार्गे महाराष्ट्रात पोहोणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसManipur State Congress Partyमणिपूर स्टेट काँग्रेस पार्टी