शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
2
'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं
3
बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत
4
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
5
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
6
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
7
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
8
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
9
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
10
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
11
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
12
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
13
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
14
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
15
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
16
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
17
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
18
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
19
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
20
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी

मणिपूरमध्ये ब्रॉडबँड सेवा सुरू, पण मोबाइल इंटरनेट राहणार बंद; ‘या’ अटी पाळाव्याच लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 7:15 PM

Manipur Violence: मणिपूर सरकारने ब्रॉडबँड इंटरनेट सेवेवरील निलंबन सशर्त मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

Manipur Violence: मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेमुळे देश हादरला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर जातीने लक्ष घालत असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ताशेरे ओढत राज्य आणि केंद्र सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यावर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यानंतर आता मणिपूरमधील ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी मोबाइल इंटरनेट मात्र बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर  ब्रॉडबँड सेवेवरील बंदी अंशतः उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या अटींचे पालन न केल्यास संबंधित नागरिकावर कारवाई केली जाणार आहे. मणिपूरमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाल्यापासून इंटरनेटवर बंदी घातलण्यात आली होती. यानंतर सुमारे ८० दिवसांनी मणिपूर सरकारने ब्रॉडबँड सेवा अटीशर्तींसह सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मोबाईलच्या इंटरनेटवर अद्याप पूर्णपणे बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

मोबाइल इंटरनेटवरील बंदी कायम

संपूर्ण मणिपूरमध्ये मोबाइल इंटरनेटवर बंदी कायम राहणार आहे. मोबाइलवरुन सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर खोटी माहिती आणि अफा पसरवली जाते. अफवांपासून बचावासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी मोबाइल इंटरनेटवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे, असे सांगितले जात आहे. 

मणिपूर सरकारच्या नेमक्या अटी काय?

मणिपूरमध्ये ब्रॉडबँड सेवा सुरु करण्यात आली आहे. पण यासाठी अटी घालण्यात आल्या आहेत. या अटीचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. ब्रॉडबँड वापरासाठी स्टॅटिक आयपी अ‍ॅड्रेसचाच वापर करण्यात यावा. वायफाय हॉटस्पॉट वापरता येणार नाही. बंदी असलेल्या किंवा ब्लॉक केलेल्या सोशल मीडिया वेबसाइट्स तसेच व्हीपीएन वापरता येणार नाहीत. दररोज इंटरनेट लॉगिन क्रेडेन्शिअल्स बदलावे लागणार आहेत, अशा काही अटी घालण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, मणिपूरमधील चुरंदचंदपूर आणि फेरझॉल इथे २८ एप्रिलपासून इंटरनेटवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर ३ मे पासून संपूर्ण राज्यभरात इंटरनेटवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर प्रत्येक पाच दिवसांनंतर ब्रॉडबँड आणि मोबाइल इंटरनेटवर बंदीचे आदेश काढण्यात आले होते. 

 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारInternetइंटरनेटState Governmentराज्य सरकार