शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मणिपूर हिंसाचारप्रकरणी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, शांतता समिती गठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 16:54 IST

विविध जाती संघटनांमध्ये सामंजस्यपूर्ण संवाद साधता यावा, यासाठी शांतता समिती सामाजिक सलोखा आणि बंधुता वाढवण्यासाठीही प्रयत्न करणार आहे.

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचार प्रकरणाबाबत (Manipur Violence) मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत. हिंसाचाराच्या प्रकरणी केंद्र सरकारने मणिपूरच्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती (Peace Committee) स्थापन केली आहे. या समितीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असणार आहे. यासोबतच अनेक माजी नागरी सेवकांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समितीच्या सदस्यांमध्ये मुख्यमंत्री, राज्य सरकारचे काही मंत्री, खासदार, आमदार आणि विविध राजकीय पक्षांचे नेते यांचा समावेश आहे. या समितीत माजी नागरी सेवक, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध जातीय समूहांच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात आला आहे. राज्यातील विविध जातीय समूहांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची प्रक्रिया सुलभ करणे, ज्यामध्ये विवादित पक्ष/गटांमधील शांततापूर्ण संवाद आणि वाटाघाटी यांचा समावेश आहे, हे समितीचे उद्दिष्ट असणार आहे.

विविध जाती संघटनांमध्ये सामंजस्यपूर्ण संवाद साधता यावा, यासाठी शांतता समिती सामाजिक सलोखा आणि बंधुता वाढवण्यासाठीही प्रयत्न करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 29 मे 2023 ते 1 जून 2023 या कालावधीत मणिपूर राज्याचा दौरा केला होता आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शांतता समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. मणिपूरमध्ये अजूनही हिंसाचाराचा काळ सुरूच आहे. 

दरम्यान, शुक्रवारी सैनिकांच्या गणवेशात आलेल्या मैती समाजाच्या अतिरेक्यांनी आधी गावकऱ्यांना कोबिंगच्या बहाण्याने घराबाहेर बोलावले आणि नंतर त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. मणिपूर हिंसाचाराचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने आतापर्यंत सहा एफआयआर नोंदवले आहेत, ज्यामध्ये पाच गुन्हेगारी कटाशी संबंधित आहेत. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार