शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजपाच्या 9 आमदारांनी मोदी सरकारविरोधात लिहिलं पत्र; 8 जणांनी दुसऱ्या दिवशी मारली पलटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:54 IST

Manipur Violence : पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना होण्याच्या एक दिवस आधी दिलेल्या निवेदनात आमदारांनी म्हटलं आहे की, सध्या सरकार आणि प्रशासनावर विश्वास उरलेला नाही.

मणिपूरमधील हिंसाचार शांत होत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ठिकाणी अजूनही गोळीबार सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री 11.45 वाजता पूर्व मणिपूरमधील थांगजिंग येथे स्वयंचलित शस्त्रांमधून सुमारे 15-20 राऊंड गोळीबार ऐकू आला. गेलजँग आणि सिंगडा येथूनही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. याच दरम्यान, भाजपाच्या नऊ आमदारांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून लोकांचा मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्यावरील विश्वास उडाला आहे असं सांगितलं.

पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना होण्याच्या एक दिवस आधी त्यांना दिलेल्या निवेदनात आमदारांनी म्हटलं आहे की, सध्या सरकार आणि प्रशासनावर विश्वास उरलेला नाही. लोकांचा राज्य सरकारवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. योग्य प्रशासन आणि कायद्याचे पालन करून काम करण्यासाठी काही विशेष उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो जेणेकरून सामान्य जनतेचा विश्वास पुन्हा स्थापित होईल. हे निवेदन विरोधी पक्षाच्या आमदारांनी नाही, तर भाजपाच्या आमदारांनी पंतप्रधानांना दिले आहे. 

नऊ आमदारांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने जनतेचा पाठिंबा गमावला आहे, हे सर्व मणिपूरचे भाजपा आमदार आहेत आणि त्यात करम श्याम सिंह, राधेश्याम सिंह, निशिकांत सिंह सपम, रघुमणी सिंह एस. ब्रोजेन सिंह, टी रॉबिंद्रो सिंह, एस राजेन सिंह, एस केबी देवी आणि डॉ. वाय. राधेश्याम यांचा समावेश आहे. हे सर्व मैतेई समाजाचे आहेत. राज्यातील मैतेई आणि कुकी यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात मुख्यमंत्र्यांवर त्यांच्याच समुदायाचे, मैतईचे समर्थन केल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे.

बिरेन सिंह सरकारला अपयशी ठरवणाऱ्या या निवेदनाकडे मणिपूर भाजपामधील असंतोषाचा आणखी एक भाग म्हणून पाहिले जात आहे. 20 मे रोजी, नऊपैकी आठ स्वाक्षरी करणारे आमदार, हे 30 भाजपा आमदारांच्या गटात सामील झाले जे मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात, ज्यात त्यांचे जावई राजकुमार इमो सिंह यांचा समावेश आहे. करम श्याम सिंह यांनी तर काही लोक पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मणिपूरचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वजण एकवटले आहेत, असे विधान केलं. 

एप्रिलमध्ये, करम श्याम यांनी मणिपूर पर्यटन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आरोप केला की, त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. केवळ करम श्यामच नाही तर स्वाक्षरी करणारे तीन इतर - राधेश्याम सिंह, एस ब्रोजेन सिंह आणि रघुमणी सिंह यांनी अप्रत्यक्षपणे बीरेन सिंह यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आणि सरकारमधील विविध प्रशासकीय आणि सल्लागार पदांचा राजीनामा दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा