शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

मणिपूर हिंसाचार: केंद्रीय राज्यमंत्र्याचेही घर जाळले! मोठ्या प्रमाणात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2023 09:41 IST

५० जणांनी पेट्रोल बॉम्ब फेकले

इंफाळ: मणिपूरमध्ये ३ मेपासून आरक्षणावरून कुकी आणि मेतेई समुदायांमध्ये जातीय हिंसाचाराची आग वाढतच चालली आहे. येथे आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरा पुन्हा हिंसाचार उसळला. १० लोकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लोकांनी भाजप खासदार आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्या इंफाळ येथील घराची तोडफोड करून ते पेटवून दिले.

सुरक्षा दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी गुरुवारी रात्री आग लावण्याचा जमावाचा प्रयत्न हाणून पाडला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेच्या वेळी केरळ दौऱ्यावर असलेले सिंह तेथील कार्यक्रम रद्द करून मणिपूरकडे निघाले आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी बुधवारी हत्या करणाऱ्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, मणिपूर हिंसाचारावर चर्चेसाठी संसदेच्या स्थायी समितीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.

...या नेत्यांना केले आतापर्यंत लक्ष्य!

गेल्या २० दिवसांत मणिपूरमधील मंत्री आणि आमदारांच्या घरांवर हल्ल्याची ही चौथी घटना आहे. याआधी १४ जूनला इंफाळच्या लामफेल भागात उद्योगमंत्री नेमचा किपजेन यांच्या अधिकृत बंगल्याला आग लावण्यात आली होती. त्यावेळी किपगेन घरी नव्हते. ८ जून रोजी भाजप आमदार सोरासम केबी यांच्या घरावर आयईडी हल्ला झाला होता. २८ मे रोजी काँग्रेस आमदार रणजित सिंह यांच्या घरावरही हल्ला झाला होता.

आतापर्यंत काय झाले?

  • ३ मे पासून  हिंसाचार सुरू
  • १००+ जणांचा मृत्यू 
  • ४००+ जखमी
  • ८० हजारपेक्षा अधिक लोकांनी घर सोडले
  • २० दिवसांमध्ये चार मंत्री आणि आमदारांच्या घरांवर हल्ले

जवानांना ताजे जेवण मिळेना

मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या सात बटालियनला गेल्या १८ दिवसांपासून ताजे जेवण मिळाले नाही. आसाम रायफल्स कुकी समुदायाची बाजू घेत असल्याचा आरोप करत मेतेई समुदायाने ताजे रेशन मिळण्याचे सर्व रस्ते ब्लॉक केले आहेत.

भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाने मणिपूरला ४० दिवसांहून अधिक काळ हिंसाचाराच्या आगीत जळत ठेवले आहे, ज्यात शंभरहून अधिक लोक मारले गेले. पंतप्रधान पूर्णपणे गप्प आहेत. हिंसाचार संपवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यात पाठवावे. हा द्वेषाचा बाजार बंद करूया आणि मणिपूरमधील प्रत्येक हृदयात प्रेमाचे दुकान उघडूया. -राहुल गांधी, काँग्रेस नेते

रात्री १० च्या सुमारास ५० हून अधिक लोकांनी माझ्या घरावर हल्ला केल्याचे मला सांगण्यात आले. हिंसाचाराच्या घटनांमुळे मी आश्चर्यचकित झालो आहे. मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. -राजकुमार रंजन सिंह, परराष्ट्र राज्यमंत्री

म्यानमारमधून ३०० सशस्त्र लोकांची घुसखोरी

३०० सशस्त्र लोक म्यानमारमधून राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात दाखल झाल्याचे वृत्त आहे. तोरबुंगच्या जंगलात तळ बनवल्यानंतर हा हिंसाचार करणारा गट चुरचंदपूरकडे वळला आहे. त्यांना शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणा ड्रोनचा वापर करत आहेत.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार