शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
2
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
3
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
4
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
5
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
6
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
7
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
8
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
9
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
10
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
11
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
12
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
13
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
14
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
15
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
16
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
17
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
18
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
19
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
20
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?

मणिपूरला पुन्हा एकदा शांतताप्रिय राज्य करणार, ‘न्याय यात्रे’त राहुल गांधी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 8:19 AM

राहुल यांनी सोमवारी सकाळी पुढील प्रवास सुरू केला. ते काही अंतर पायीही चालले. त्यांनी लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

सेनापती (मणिपूर) : काँग्रेस मणिपूरला पुन्हा शांततापूर्ण व सौहार्दपूर्ण बनवू इच्छिते, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या दुसऱ्या दिवशी सोमवारी येथे सांगितले. आपला पक्ष राज्यातील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही ते म्हणाले. 

राहुल यांनी सोमवारी सकाळी पुढील प्रवास सुरू केला. ते काही अंतर पायीही चालले. त्यांनी लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जेव्हा राहुल यांची बस येथील गजबजलेल्या भागातून गेली, तेव्हा बहुतांश करून महिला आणि मुलांसह अनेक लोकांनी यात्रा मार्गावर रांगेत उभे राहून राहुल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. सेनापती येथे बसच्या टपावर उभे राहून त्यांनी लोकांना संबोधित केले.

‘याआधी काँग्रेसने कन्याकुमारी ते  काश्मीर अशी यात्रा काढली. लोकांना एकजूट करणे हा या यात्रेचा उद्देश होता. ही यात्रा खूप यशस्वी ठरली. यादरम्यान आपण चार हजार कि.मी. चाललो’, असे ते म्हणाले. 

तुमच्या वेदनांची जाणीवआम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे आणखी एक यात्रा करायची होती व आम्ही ठरवले की मणिपूरपासून सुरुवात करणे ही सर्वांत प्रभावी गोष्ट असेल. कारण, यामुळे मणिपूरचे लोक कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, हे भारतीय जनतेला कळू शकेल. तुम्ही सोसलेल्या वेदनांची मला  जाणीव आहे,  असे राहुल म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा