शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

मणिपूरच्या वेदना हृदयद्रावक; सरकार मात्र उदासीन; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 8:55 AM

दरम्यान, केंद्र सरकार मणिपूरमधील परिस्थितीबाबत उदासीन आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर केला.

नवी दिल्ली : विरोधी पक्षाच्या खासदारांनी सोमवारी मणिपूरच्या दौऱ्यावर असलेल्या ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) या विरोधी आघाडीच्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हिंसाचारग्रस्त राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. दरम्यान, केंद्र सरकार मणिपूरमधील परिस्थितीबाबत उदासीन आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर केला.

या खासदारांनी संसद भवनातील एका कक्षात ‘इंडिया’मधील घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) नेते टीआर बाळू, समाजवादी पक्ष (एसपी) नेते राम गोपाल यादव आणि इतर पक्षांचे नेते उपस्थित होते.

खरगे यांनी म्हटले की, मणिपूर उलथापालथीचा सामना करत आहे; पण केंद्र सरकार उदासीन दिसत आहे. तेथील लोकांच्या वेदना ऐकल्या, ज्या हृदयद्रावक आहेत. मणिपूरमध्ये सुमारे १० हजार निष्पाप मुलांसह ५० हजारहून अधिक लोक अपुऱ्या सुविधा असलेल्या मदत शिबिरांमध्ये आहेत. लोकांना औषधे आणि अन्नाची कमतरता भासत आहे.

संसद पुन्हा ठप्प-  मणिपूरच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत गेल्या काही दिवसांप्रमाणेच सोमवारीही विरोधी सदस्यांच्या गदारोळामुळे कामकाज ठप्प झाले; परंतु संख्याबळाच्या बळावर अनेक विधेयके मंजूर करून घेणे सुरूच राहिले. -  लोकसभा एकवेळ तहकूब केल्यानंतर दुपारी २ वाजता कामकाज सुरू झाले तेव्हा काँग्रेससह विरोधी पक्षांचे सदस्य मणिपूरच्या मुद्द्यावर घोषणा देत व्यासपीठाजवळ आले. लोकसभा अध्यक्ष किरीट सोळंकी यांनी गदारोळातच आवश्यक ती कागदपत्रे पटलावर ठेवली.

हा संसदेचा अवमानविरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर सरकार चर्चा करीत नाही, हा संसदेचा अवमान असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनीही सरकारने आधी अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली.

मणिपूरमुळे गोव्यात गदारोळमणिपूर प्रश्नावरून गोवा विधानसभेत सोमवारी गदारोळ माजविणाऱ्या विरोधी पक्षांच्या सातही आमदारांना २ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. त्यामध्ये विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस आमदार अल्तोन डिकोस्टा, कार्लोस फरेरा, आपचे आमदार व्हेंझी व्हिएगास, क्रूझ सिल्वा, गोवा फॉरवर्ड पार्टीचे आ. विजय सरदेसाई व रेव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीचे आमदार वीरेश बोरकर यांचा समावेश आहे.

पोलिसांना माघारी बोलवा मणिपूरमधील मोरेह शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तैनात केलेली राज्य पोलिसांची पथके तिथून त्वरित हटवावीत या मागणीसाठी हजारहून अधिक मणिपुरी महिलांनी चुराचंदपूर येथे सोमवारी धरणे धरले. आमची मागणी मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. तेंगनौपाल जिल्ह्यातील कुकी-झो जमातीच्या महिलांनी २८ जुलै रोजी मोरेह येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. या शहरात पोलिस पथकांनी प्रवेश करू नये यासाठी त्यांनी निदर्शनेही केली होती. 

भारतीय फुटबॉलपटूचे घर जमावाने जाळलेभारतीय फुटबॉलपटू चिंगलेनसाना सिंह हे मणिपूरचे मूळ रहिवासी आहेत. मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात त्यांचे घर जमावाने जाळले होते. त्याबाबत चिंगलेनसाना सिंह यांनी सांगितले की, मला कळले की चूरचांदपूर जिल्ह्यातील खुमुजामा लेकेई येथील त्यांचे घर जाळण्यात आले. या भीषण घटनेतून सुदैवाने माझे कुटुंबीय वाचले. 

केंद्राने मदत करावी - मिझोरामहिंसाचारग्रस्त मणिपूरमधील १२६०० जणांनी आपले घरदार सोडून मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे. या निर्वासितांना निवारा व अन्य सुविधा पुरविण्यासाठी केंद्राकडून आर्थिक मदत कधी मिळेल याची मिझोराम सरकार प्रतीक्षा करत आहे. मणिपूरमधील हिंसाचाराचा निषेध करणारा ठराव पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये सोमवारी मंजूर करण्यात आला. या ठरावाला भाजपने विरोध केला होता.  

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसManipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा