शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

Mann Ki Baat: यंदाचा गणेशोत्सव 'असा' साजरा व्हावा; मोदींचं गणेश भक्तांना खास आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 12:58 IST

मन की बातमधून मोदींचा देशवासीयांशी संवाद; विविध विषयांवर पंतप्रधानांचं भाष्य

नवी दिल्ली: कोरोना संकट, सीमेवरील वाढता तणाव या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मधून देशवासीयांशी संवाद साधला. २०२० वर्ष आव्हानात्मक आहे. मात्र आपण सर्व आव्हानांचा हिमतीनं मुकाबला करू, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सध्या देश अनलॉक होत आहे. मात्र सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा 'आत्मनिर्भर भारत'चा पुनरुच्चार केला.देशात मान्सूनचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात आपण पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पावलं उचलायला हवीत, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी गणेश भक्तांना विशेष आवाहन केलं. 'सध्या अनेक ठिकाणी गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. यंदाचा गणेशोत्सव आपण पर्यावरणपूरक करू शकतो का? आपण  केवळ पर्यावरणस्नेही मूर्तींची पूजा करू शकतो का?,' अशा शब्दांत मोदींनी इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचा आग्रह धरला. विसर्जनानंतर नदी, तलावातील पाणी प्रदूषित करणाऱ्या, जलचरांसाठी धोका ठरणाऱ्या मूर्तींचा वापर आपण थांबवू शकतो का?, असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थित केला. तुम्ही माझ्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्याल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता राज्यातील बऱ्याचशा मंडळांनी साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मोठ्या मंडळांनी कमी उंचीची मूर्ती आणण्याचा निर्धार केला आहे. पाद्यपूजन, आगमन मिरवणूक रद्द करणाऱ्या मंडळांची संख्यादेखील मोठी आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी