शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

'नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले; सरदार पटेल, डॉ. आंबेडकर पात्र होते'- मनोहर लाल खट्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 20:49 IST

Manohar Lal Khattar Remarks: केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Manohar Lal Khattar On Jawaharlal Nehru: केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी (12 जानेवारी 2025) देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. 'जवाहरलाल नेहरू योगायोगाने भारताचे पंतप्रधान झाले. खरं तर, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या पदासाठी पात्र होते', असे म्हणत त्यांनी नवीन वादाला तोंड पोडले आहे. 

हरियाणाच्या रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठात बोलताना खट्टर म्हणतात, 'मला सांगायचे आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले. त्यांच्या जागी सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ.बी.आर.आंबेडकर यांसारखे लोक पात्र होते. डॉ. आंबेडकरांची भूमिका त्यांच्यापेक्षा कमी नव्हती, पण जे काही झाले घडले, हा त्या काळातील जनतेचा निर्णय होता.'

आंबेडकरांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा दिली नाहीखट्टर पुढे म्हणतात, 'या देशाचे संविधान हा आपला पवित्र ग्रंथ आहे आणि त्याला आकार देण्यासाठी डॉ. बी.आर. आंबेडकरांचे योगदान आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. आपण वेळोवेळी त्यांचा आठवण काढली पाहिजे. लक्षात ठेवा की, आंबेडकरांनादेखील अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर दिल्लीत अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यात आली नाही नव्हती.' 

भाजप सरकारमध्ये आंबेडकरांचा गौरव'सरकार सत्तेवर आल्यानंतर आंबेडकरांच्या नावाशी संबंधित पाच पवित्र स्थळांची स्थापना करण्यात आली. या कार्यकाळात डॉ.आंबेडकरांबद्दल आदर दाखवला गेला, जो यापूर्वी कधीही झाला नव्हता. आज भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या कोणत्याही नेत्याला सर्वोच्च सन्मान द्यायचा असेल, तर तो नक्कीच डॉ. आंबेडकरांना दिला जाईल, असेही खट्टर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपाcongressकाँग्रेसDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर