शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'अनेक वर्षांपासून एकच फेल प्रोडक्ट लॉन्च करत आहेत', PM मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 18:40 IST

'विरोधकांनी बंगळुरुमध्ये UPAचा अंतिम संस्कार केला, काँग्रेसला जनतेने नाकारले.'

Parliament Mansoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी काँग्रेसला देशातील जनतेले नाकारल्याची टीका केली. तसेच, युपीए नाव बदलण्यावरुनही खोचक टोला लगावला. याशिवाय, काँग्रेसवाले अनेक वर्षांपासून एकच फेल प्रोडक्ट परत परत लॉन्च करतात. प्रत्येकवेळी लॉन्चिंग फेल होते, असे म्हणत राहुल गांधींवरही टीका केली.

काँग्रेसला अनेक राज्यातून हद्दपार केलेयावेळी विरोधकांच्या INDIA आघाडीवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, 'काही दिवसांपूर्वी विरोधकांनी बंगळुरुमध्ये यूपीएचे यूपीएचा अंतिम संस्कार करत आनंदोत्सवही साजरा केला. मी विरोधकांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. काँग्रेसच्या गर्वाचा चक्काचूर झाला आहे. त्यांना स्थानिक पातळीची काहीच कल्पना नाही. बंगाल, ओडिशा, नागालँड, तामिळनाडू, यूपी, बिहार आणि इतर अनेक राज्यांचा काँग्रेसवर विश्वास नाही. यामुळेच तेथील जनतेने काँग्रेसला हद्दपार केले आहे.'

2028 मध्ये विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतील पीएम मोदी पुढे म्हणतात, '2018 मध्ये यांनी आमच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला, 2019 मध्ये आम्ही सत्ते आलोत. आता परत त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला, आम्ही पुन्हा एकदा येणार आहोत. 2028 मध्येही विरोधक पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणतील, कारण विरोधकांची विचारसरणीच अविश्वासाने भरलेली आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मी शिव्यांना टॉनिक बनवतो पीएम मोदी म्हणाले की, 'विरोधी पक्षांच्या लोकांना एक गुप्त वरदान मिळाले आहे. ते ज्यांच्याबद्दल वाईट विचार करतात, त्यांचे चांगले होते. मी एक उदाहरण तुमच्यासमोर उभा आहे. 20 वर्षे झाले, ते माझे काहीही करू शकले नाहीत. तीन दिवसांपासून सभागृहात माझ्यासाठी वाईट शब्द बोलले गेले. त्यांची आवडती घोषणा आहे, मोदी तेरी कबर खुदेगी. पण, मी शिव्यांना टॉनिक बनवतो,' असंही मोदी यावेळी म्हणाले.

काँग्रेसला कुटुंबवाद आवडतो पीएम मोदी पुढे म्हणाले की, 'सगळीकडे एकाच कुटुंबाचे नाव दिसते. त्यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीही काम केले नाही. काँग्रेसकडे स्वतःचे असे काहीही नाही. निवडणूक चिन्हापासून ते कल्पनेपर्यंत सर्व काही दुसऱ्याकडून घेतले आहे. काँग्रेसची स्थापना परकीयांनी केली. विश्वासार्हता वाढवण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय तिरंग्यासारखा ध्वज स्वीकारला, त्यांनी फायद्यासाठी गांधी आडनावही चोरले. काँग्रेसला कुटुंबवाद आवडतो. ही इंडिया आघाडी नाही, घमंडिया आघाडी आहे. त्यांच्यात प्रत्येकालाच पंतप्रधान व्हायचं आहे,' असा टोलाही मोदींनी यावेळी लगावला.

संबंधित बातमी- फिल्डिंग तुम्ही लावली अन् चौकार-षटकार इथून लागले; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसParliamentसंसद