शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

"अनेक शेतकरी मोडून पडतील"; कांद्याच्या निर्यातशुक्लावरुन सुप्रिया सुळेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 2:04 PM

मुंबई - कांद्याचे दर वाढण्याच्या भीतीने केंद्र सरकारने शनिवारी कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले आहे. पुढील ५ ...

मुंबई - कांद्याचे दर वाढण्याच्या भीतीने केंद्र सरकारने शनिवारी कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले आहे. पुढील ५ महिने म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावरील हे निर्यातशुल्क लागू असेल. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची पुरेशी उपलब्धता राहावी, यासाठी शुल्क लागू केल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे. तसेच, कांद्याचे दर वाढू नयेत, यासाठीही हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही यासंदर्भात चिंता व्यक्त करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत, आपण केंद्र सरकारला निर्बंध किंवा निर्यातबंदी न करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने शेवटी तेच केले, असे म्हटले आहे. 

शेतकऱ्यांशी बोलत असताना, केंद्र सरकार निर्यातीसंबंधी बंदी किंवा निर्बंध यापैकी काही निर्णय घेऊ शकतात अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार मी केंद्र सरकारला विनंती करुन असा काही निर्णय घेऊ नका असे सांगितले होते. त्यावेळी आम्ही असं काही करणार नाही, असे मला सांगण्यात आले. परंतु, आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीतून चांगलं उत्पन्न मिळत असताना सरकारने निर्यातीवर ४० टक्के शुल्क चढविले. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. अनेक शेतकरी अक्षरशः मोडून पडतील अशी स्थिती असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.  

शेतकरी हिताचा विचार करावा

सरकार ग्राहकहिताचा दाखला जरी देत असलं तरी ग्राहक आणि उत्पादक अशा दोघांच्याही हिताचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. कोणत्याही एका घटकाचे पोषण आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष अशी भूमिका सरकारने घेता कामा नये. याबाबत संतुलन राखणे शासनाचे काम आहे. म्हणूनच माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की कृपया या निर्यातशुल्काच्या बाबतीत योग्य तो विचार करावा आणि जसा आपण ग्राहकहिताचा विचार केला तसाच शेतकरी हिताचाही विचार करावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन केली आहे.  

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेonionकांदाCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाFarmerशेतकरी