शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: विराट-रोहितने लाखोंच्या जनसमुदायासमोर एकत्र जल्लोष करून ट्रॉफी उंचावली तेव्हा...
2
Fake T20 World Cup Trophy : व्हिक्ट्री परेडमध्ये रोहित शर्मा अँड कंपनीच्या हाती 'डुप्लिकेट' वर्ल्ड कप ट्रॉफी! पण का...? जाणून थक्क व्हाल
3
अंबानींकडून एका दिवसासाठी एवढी 'तगडी' रक्कम वसूल करतोय जस्टिन बिबर, रिहानाही पडली मागे!
4
राम मंदिरातील पुजाऱ्यांचं वेतन ठरलं, थेट खात्यात जमा होणार पैसे! अँड्रॉइड फोनचीही परवानगी, पण...
5
जन्मदात्या मातांनाच मुलांनी घातला गंडा, एकाने तर खोटी आईच उभी केली; फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल
6
सुनक की स्टार्मर? ब्रिटेनमध्ये आज मतदान; लाखो भारतीय मतदारांचा कौल कुणाकडे, पाहा...
7
“कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे”: अमोल कोल्हे
8
Team India Arrival LIVE: 'वानखेडे'वर पोहोचताच विराट-रोहितचा जबरदस्त डान्स!
9
मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...
10
कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला, सरकारने मालकाला थेट तुरुंगात पाठवला, कारण वाचून बसेल धक्का
11
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा; पीएम मोदींना देणार आव्हान...
12
“राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा”; संजय राऊतांची मागणी, सरकारवर केली टीका
13
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
14
Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर
15
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
16
Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती
17
Video: "तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो रिलीज
18
“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका
19
60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार
20
“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान

श्रीलंकेप्रमाणेच भारतातील अनेक राज्यं दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; पाहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 1:15 PM

लोकानुनयी घोषणा, मोफतच्या योजनांमुळे देशातील अनेक राज्यांच्या तिजोरीत खडखडाट

नवी दिल्ली: निवडणुका आल्यावर राजकीय पक्ष मोठमोठ्या घोषणा करतात. मतं मिळवण्यासाठी आश्वासनं दिली जातात. मोफत वीज, पाणी, कर्जमाफी यासारख्या घोषणांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडतो. राज्य कर्जाच्या विळख्यात सापडतात. कर्जाच्या बोज्यामुळे भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेत अभूतपूर्व संकट निर्माण झालं आहे. श्रीलंकेसारखीच स्थिती भारतात निर्माण होऊ शकते, अशी भीती आयएएस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी भविष्यातला धोका सांगितला.

नुकत्याच पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्यापैकी एका राज्यात करण्यात आलेल्या लोकानुनयी योजनांचा उल्लेख सचिवांनी केला. संबंधित राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यामुळे अशा राज्यांमध्ये लोकानुनयी योजना राबवल्यास आर्थिक स्थिती बिघडेल आणि श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती सचिवांनी व्यक्त केली.

राज्यांमध्ये अनेक योजना राबवल्या जात आहेत. यातल्या अनेक योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीत. अशा योजनांमुळे आपण श्रीलंकेच्या दिशेनं जाऊ, असा धोक्याचा इशारा सचिवांनी दिला. यापैकी बहुतांश सचिवांनी केंद्रासाठी काम करण्यापूर्वी राज्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. 

देशातील काही राज्यांची आर्थिक स्थिती तोळामासा झाली आहे. ही राज्यं भारताचा भाग नसती, तर आतापर्यंत ती दिवाळखोर झाली असती, असं सचिवांनी सांगितलं. पंजाब, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यातील सरकारांनी लोकानुनयी घोषणा केल्या आहेत. या योजना फार काळ चालवता येणार नाहीत. त्यामुळे तोडगा काढण्याची गरज आहे.

अनेक राज्यांमध्ये मोफत वीज दिली जात आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडत आहे. आरोग्य आणि शिक्षणासारख्या क्षेत्रांना यामुळे पुरेसा निधी मिळत नाही. भाजपनंही नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीत मोफत एलपीजी कनेक्शन देण्यासोबतच अनेक लोकानुनयी घोषणा केल्या होत्या.