शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'हा' मराठी माणूस आहे त्रिपुरामधील भाजपाच्या विजयाचा शिल्पकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 16:54 IST

त्रिपुरा हे ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य भाजपाने काबीज केले आहे. गेल्या 25 वर्षांपासूनची डाव्यांची या राज्यातील सत्ता उलथवून टाकणे एक मोठे आव्हान होते.

ठळक मुद्देत्रिपुरामधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर सुनील देवधर हे नाव समोर आले आहे. त्रिपुरा जिंकणे हा मोदी सरकारसाठी फक्त ऐतिहासिक विजय नाहीय तर भाजपाला यानिमित्ताने सुनील देवधर यांच्या रुपाने परिस गवसला आहे. 

नवी दिल्ली - त्रिपुरा हे ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य भाजपाने काबीज केले आहे. गेल्या 25 वर्षांपासूनची डाव्यांची या राज्यातील सत्ता उलथवून टाकणे एक मोठे आव्हान होते. माणिक सरकार गेली सलग २० वर्षे मुख्यमंत्री पदावर होते त्यांच्या स्वच्छ आणि पारदर्शक कामाच्या पार्श्वभूमीवर विजय मिळवणे अत्यंत कठीण काम होते. पण डाव्यांची या राज्यातील मक्तेदारी मोडून काढणे भाजपाला शक्य झाले ते संघटनात्मक शक्तीच्या बळावर. 

त्रिपुरामधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर सुनील देवधर हे नाव समोर आले आहे. सुनील देवधर यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे भाजपाला त्रिपुराचा गड काबीज करता आला. मूळचे मुंबईकर असलेले सुनील देवधर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झाले आहेत. गत विधानसभा निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यामुळे संपूर्ण राज्य जिंकण्यासाठी भाजपाला शुन्यातून सुरुवात करायची होती. 

दोन वर्षांपूर्वी सुनील देवधर यांच्याकडे त्रिपुराची जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासून त्यांनी या राज्यात तळ ठोकला व राजकीय समीकरणाची जुळवाजुळव सुरु केली. त्रिपुरा जिंकणे हा मोदी सरकारसाठी फक्त ऐतिहासिक विजय नाहीय तर भाजपाला यानिमित्ताने सुनील देवधर यांच्या रुपाने परिस गवसला आहे. 

जाणून घेऊया कोण आहेत सुनील देवधर - 52 वर्षांचे सुनील देवधर आरएसएसच्या तालमीत तयार झाले असून त्रिपुराच्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांना राज्याचे प्रभारी बनवण्यात आले. 

- 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात सुनील देवधर यांच्यावर प्रचार व्यवस्थापकाची जबाबदारी होती. 

- नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुनील देवधर त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रणनितीकार म्हणून काम करत होते. 

- देवधर यांनी मेघालयमध्ये आरएसएस प्रचारक म्हणूनही काम केले आहे. 

- 2013 साली दिल्ली विधानसभा निवडणुकीत दक्षिण दिल्लीत काम करताना देवधर यांच्या रणनितीमुळे भाजपाला 10 पैकी सात जागा जिंकता आल्या होत्या. 

- त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी दूत योजना नावाचे एक अभियान सुरु केले. या अभियानातंर्गत त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची स्थानिक भाषेत माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली.                         

- आदिवासी बहुल भागातील  मते भाजपाकडे वळवण्यासाठी देवधर यांनी  जानेवारी महिन्यात आयपीएफटीसोबत आघाडी केली. 

- आपण मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही हे सुनील देवधर यांनी जाहीर केले आहे.    

                                

 

टॅग्स :Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018