शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

मार्च-एप्रिलमध्ये नरेंद्र मोदींच्या ७९, तर राहुल यांच्या ७५ सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 02:45 IST

२४ राज्यांतील प्रचार दौरा, अमित शहांनीही घेतल्या ५0 सभा, महाराष्ट्रात मोदींच्या ८, राहुल यांच्या ४ तर शहा यांच्या ५ सभा

संदीप आडनाईक 

नवी दिल्ली : सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यात २४ राज्यांत जवळपास ७९, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ७५ तर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जवळजवळ ५0 प्रचार सभा आजअखेर घेतल्या आहेत. मोदी यांनी ८८,३७0 किलोमीटर, राहुल यांनी ९३,0६६ किलोमीटर तर अमित शहा यांनी ६६,९0९ किलोमीटरचा प्रवास करून मतदारसंघ ढवळून काढले आहेत.

राहुल गांधी यांनी देशात ११ मार्च ते २६ एप्रिल यादरम्यान ७५ ठिकाणी प्रचार सभा घेतल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रात अवघ्या चार ठिकाणी सभा झाल्या आहेत. त्यांनी ३ एप्रिल रोजी पुणे, चंद्रपूर आणि वर्धा आणि २६ रोजी अहमदनगर येथे प्रचार सभा घेतल्या.

अमित शहा यांनी देशात २४ मार्च ते २३ एप्रिल दरम्यान ५0 ठिकाणी प्रचार सभा घेतल्या आहेत. यामध्ये पाच सभा त्यांनी महाराष्ट्रात घेतल्या आहेत. यामध्ये २९ मार्च रोजी औरंगाबाद, ९ एप्रिल रोजी नागपूर, १७ रोजी सांगली, १८ रोजी जालना,१९ रोजी बारामती येथे त्यांच्या सभा झाल्या आहेत.नरेंद्र मोदी यांनी देशात २0 मार्च ते २६ एप्रिल अखेर ७९ ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. त्यातील ८ सभा महाराष्ट्रात घेतल्या आहेत. यामध्ये १ एप्रिल रोजी वर्धा, ३ एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया, ६ रोजी नांदेड, ९ रोजी लातूर, १२ रोजी अहमदनगर, १७ रोजी माढा, २२ रोजी दिंडोरी आणि नंदुरबार येथे त्यांच्या प्रचारसभा झाल्या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी