शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
5
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
6
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
7
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
8
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
9
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
10
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
11
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
12
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
15
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
16
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
17
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
18
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
19
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
20
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  

महाराष्ट्र, उत्तर भारतात लग्नं जास्त टिकतात

By admin | Published: January 18, 2016 9:58 AM

पूर्वेकडील राज्यांपेक्षा महाराष्ट्र, उत्तर भारतातील जोडप्यांचे लग्न टिकण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १८ - उत्तर भारतातील पंजाबपासून बिहार पर्यंत आणि पश्चिमेकडे महाराष्ट्रातील जोडप्यांचे लग्न टिकण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचं समोर आलं आहे. तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हेच प्रमाण अतिशय कमी असल्याचे २०११ च्या जनगणनेच्या आकड्यांमधून स्पष्ट झालं आहे. पंजाब, बिहार, महाराष्ट्र येथे ११-१२ टक्के जोडप्यांचं लग्न ४० वर्षांहून अधिक काळ टिकतं तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हेच प्रमाण अवघं ७ टक्के आहे. मेघालयमध्ये तर अवघे ४.१ टक्के जोडपी ४० वर्षांहून अधिक काळ लग्नबंधनात आहेत. हरियाण वा महाराष्ट्राच्या तुलनेत हा आकडा एक-तृतियांश आहे. 
संपूर्ण देशभरात एकूण १० टक्के जोडप्यांची लग्नं ४० वर्षांहून अधिक काळ टिकली आहेत. समाजशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, लग्न किती वर्ष टिकतं याचं प्रमाण प्रेम, एकनिष्ठता यापेक्षा रिती-रिवाज, परंपरा आणि प्रकृती, स्वास्थ्यावर जास्त अवलंबून असतं. तसेच त्या जोडप्याचं लग्न कितव्या वर्षी झालं आणि ते किती काळ जगले हेही लग्न टिकण्याच्या कालावधीतील महत्वाचे मुद्दे आहेत. सध्या नागरिकांचे आयुष्यमान वाढले असल्याने, त्यांच्या वैवाहिक जीवनाचा कालावधीही वाढतो. 
उत्तर भारतात तरूण-तरूणींचं लग्न कमी वयातच केलं जातं आणि त्यांच आयुष्य जास्त असल्याने त्यांचे वैवाहिक जीवनही बराच काळ टिकतं. तर पूर्वैकडील राज्यांमध्ये अगदी उलटी परिस्थिती आहे, तेथे लग्न उशीरा लावली जातात. हरिणायात २१ टक्के पुरूषांचं लग्न २१ व्या वर्षाच्या आधीच होऊन जातं, पण मेघालयमध्ये हाच आकडा अवघा ११ टक्के आहे. तर हरियाणात ३८ टक्के महिलाचं लग्न १८ वर्षांआधीच होत आणि मेघालयात तीच टक्केवारी अवघी १५ टक्क असल्याचे दिसून आले आहे. 
 
जास्त काळ लग्न टिकणारी राज्यं ( ४० वर्षे वा अधिक) - 
हरियाणा - ११.६ %
महाराष्ट्र - ११.६%
उत्तर प्रदेश - ११.६%
मध्य प्रदेश - ११.५%
राजस्थान - ११.२%
 
कमी वर्ष लग्न टिकणारी ५ राज्यं : 
दादरा आणि नगर हवेली - ५.४%
आसाम - ५.२ %
नागालँड - ४.८ %
अरूणाचल प्रदेश - ४.७%
मेघालय - ४.१%