शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मृत्यूनंतर तब्बल १०९ वर्षांनी झाल शहीद स्वातंत्रसैनिकावर अंत्यसंस्कार, असं कारण आलं समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 13:57 IST

Chhattisgadh: छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यामध्ये एका शहीद स्वातंत्र्यसैनिकावर त्यांच्या हौतात्मानंतर सुमारे १०९ वर्षांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. सन १९१३ मध्ये ब्रिटिश सरकारच्या काळात बलरामपूर जिल्ह्यातील लाकुंड नकेशिया या शेतकऱ्याला हौतात्म्य प्राप्त झाले होते.

रायपूर - छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यामध्ये एका शहीद स्वातंत्र्यसैनिकावर त्यांच्या हौतात्मानंतर सुमारे १०९ वर्षांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. सन १९१३ मध्ये ब्रिटिश सरकारच्या काळात बलरामपूर जिल्ह्यातील लाकुंड नकेशिया या शेतकऱ्याला हौतात्म्य प्राप्त झाले होते. नकेशिया समाजातील नागरिक बऱ्याच काळापासून त्यांच्या अस्थी देण्याची मागणी करत होते. लाकुंड यांना हौतात्म्य प्राप्त झाल्यावर त्यांच्या अस्थी इंग्रजांनी सरगुजा येथील एका सरकारी शाळेत ठेवण्यात आल्या होत्या. आदिवासींना याचा माहिती मिळाल्यावर त्यांनी स्थानिक आमदार आणि संसदीय सचिव चिंतामणी महाराज आणि अन्य लोकप्रतिनिधींकडे अस्थी परत देण्याची मागणी केली होती.

सरकारी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हुतात्मा स्वातंत्र्यसैनिकाच्या अस्थी समाजातील लोकांकडे सुपुर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ४ फेब्रुवारी २०२२ रोजी संसदीय सचिव चिंतामणी महाराज, माजी राज्यसभा सदस्य नंदकुमार साय, जिल्हा पंचायत सदस्य अंकुश सिंह खैरवार नगेशिया समाजासह स्थानिक लोकप्रतिनिधी अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सामरी पाठ येथे त्यांच्यावर हौतात्मानंतर १०९ वर्षांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

आदिवासी नगेशिया शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्रजांच्या शासनकाळामध्ये लाकुंड नगेशिया यांची इंग्रज सैनिकांनी हत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या अस्थी सरगुजा येथील एका शाळेमध्ये ठेवल्या होत्या. समाजातील लोकांनी सांगितले की, ते इंग्रजांविरोधातील असहकार आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. सामरी पाठ येथे दुष्काळ पडला होता. मात्र तरीही इंग्रजांनी कर आकारणे बंद केले नव्हते. त्याविरोधात लाकूंड यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे इंग्रजांनी त्यांची हत्या केली होती.  

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडIndiaभारतhistoryइतिहास