शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाने बनवला 'हा' मास्टरप्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 09:52 IST

कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर आता भाजपाने सरकार स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

बंगळुरू - कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करता न आल्याने कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार मंगळवारी कोसळले. कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर आता भाजपाने सरकार स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, नव्या सरकारच्या स्थापनेच्या मार्गात कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी भाजपाने मास्टरप्लान तयार केला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत तळ ठोकून असलेले काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरच बंगळुरू येथे परतणार आहेत.   कुमारस्वामी सरकार बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्याने बंडखोर आमदार खूप आनंदी असल्याचा दावा भाजपामधील सूत्रांनी केला आहे. बंडखोरांना जे हवे होते ते मिळाले आहे. आता हे आमदार येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंत बंगळुरूमध्ये माधारी येतील. दरम्यान, आपली बंडखोरी आणि सरकारचा पाठिंबा काढून घेण्यामागे भाजपाचा हात असल्याचे वृत्त संबंधित बंडखोर आमदारांनी फेटाळून लावले होते.  सरकार स्थापन करण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी मध्यरात्री भाजपाच्या आमदारांची बैठक येडियुरप्पांच्या अध्यक्षतेखाली एका हॉटेलमध्ये झाली होती. आज पुन्हा 11 वाजता भाजपा आमदारांची बैठक होणार आहे. तसेच येडियुरप्पांनी भाजपाध्यक्ष अमित शाहांना पत्र लिहून समर्थन दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते सदानंद गौडा यांनी येडियुरप्पाच कर्नाटकत भाजपाचे मुख्यमंत्री असतील, असं स्पष्ट केलं आहे. भाजपा नेते जगदीश शेट्टार म्हणाले, आमच्याकडे 105 आमदारांचं संख्याबळ आहे. सभागृहात बहुमत असल्यानं आम्ही सरकार बनवणार आहोत. तसेच काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांचे राजीनामे अद्याप कर्नाटकातल्या विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारलेले नाहीत. आता ते भाजपाबरोबर जातात की नाही, येत्या काळात समजणार आहे.

 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणYeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपा