शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पक्षाने तिकीट नाकारल्याने मुरली मनोहर जोशी संतप्त, कानपूरवासियांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 13:23 IST

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने घेतला आहे.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर आता ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनाही तिकीट नाकारण्यात आले आहे. मात्र पक्षाने तिकीट नाकारल्याचे समजताच मुरली मनोहर जोशींनी संतप्र प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी या संदर्भात कानपूरमधील मतदारांना एक पत्रही लिहिले आहे. भाजपाचे महासचिव रामलाल यांनी मुरली मनोहर जोशी यांची भेट घेऊन त्यांना यावेळी तिकीट देण्यात येणार नाही. तसेच आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा तुम्ही पक्ष कार्यालयात येऊन करावी, असे सांगितले.  मात्र तिकीट मिळणार नसल्याचे समजताच मुरली मनोहर जोशी संतप्त झाले. जर आम्हाला तिकट न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असेल, तर कमीत कमी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आम्हाला येऊन सांगितले पाहिजे होते. मी पक्ष कार्यालयात येऊन निवडणूक न लढवण्याबाबत घोषणा करणार नाही, असेही जोशी यांनी स्पष्ट केले. दरम्यान मुरली मनोहर जोशी यांनी कानपूरमधील मतदारांसाठी एक पत्रही प्रसिद्ध केले आहे. ''भारतीय जनता पक्षाचे महासचिव रामलाल यांनी मला कानपूर तसेच अन्य कुठल्याही ठिकाणाहून निवडणूक लढवू नका असे सांगितले आहे.'' असे जोशींनी या पत्रात म्हटले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक