शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

मायावतींना संताप अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:38 AM

सहारणपूरमध्ये दलितांवर झालेल्या अत्याचारावर बोलण्यास पुरेशी संधी न मिळाल्याने संतप्त झालेल्या बसपाच्या प्रमुख मायावती यांनी मंगळवारी राज्यसभेच्या

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सहारणपूरमध्ये दलितांवर झालेल्या अत्याचारावर बोलण्यास पुरेशी संधी न मिळाल्याने संतप्त झालेल्या बसपाच्या प्रमुख मायावती यांनी मंगळवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा आपण राजीनामा देऊ, अशी धमकी देत सभात्याग केला होता. पण त्या प्रत्यक्ष राजीनामा देतील, असे तेव्हा कोणाला वाटले नव्हते. मात्र त्यांच्या या विधानानंतर झालेल्या गोंधळात सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले होते.सभागृहाचे कामकाज सुरू होताच, मायावती यांनी उत्तर प्रदेशात दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला. सहारनपूरमधील हिंसाचाराचा संदर्भ देत मायावती यांनी भाजपाने जाणिवपूर्वक हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप केला. या विषयावरील त्यांना स्थगन प्रस्ताव मांडला होता. पण त्यावर केवळ तीन मिनिटेच बोलण्याची संधी देण्यात आली. त्यांनी भाजपावर आरोप करताच, सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या भाषणात अडथळे आणायला सुरुवात केली. तोपर्यंत तीन मिनिटे संपल्याने उपसभापती पी. जे. कुरियन यांनी त्यांना थांबण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या मायावती यांनी आपणास बोलू दिले जात नसल्याचा आरोप कशला आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची धमकी दिली. त्या लगेच सभागृहातून निघून गेल्या. त्याआधी काँग्रेसचे गुलाब नबी आझाद यांनी आपण या विषयावर चर्चेची नोटिस दिल्याचेही उपसभापतींच्या निदर्शनाण आणून दिले. पण तोपर्यंत सभागृहात गदारोळ सुरू झाला आणि कामकाज तहकूब करण्यात आले. मायावती यांनी केंद्र तसेच उत्तर प्रदेश सरकारवर कडाडून टीका केली. भाजप देशभरात जातीयवाद पसरवत आहे, असा आरोप त्यांनी करताच, मायावतींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपा सदस्यांनी केली. ते त्यांना बोलू देत नसल्याने मायावती सभागृहाबाहेर पडल्या. बाहेर आल्यावरही पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे पुन्हा स्पष्ट केले होते. मात्र त्यांनी रागाच्या भरात तो इशारा दिला, असे अनेकांना वाटले होते.काँग्रेससह विरोधकांचा सरकारला घेरण्याचा प्रयत्नविरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही दलितांवरील अत्याचार, गोरक्षकांकडून होणारा हिंसाचार व शेतकरी समस्यांचा मुद्दा उपस्थित करून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. असे प्रकार करण्यासाठी आपल्याला बहुमत मिळाले, असे भाजपाला वाटत असेल, तर आम्ही सरकारशी सहकार्य करणार नाही, असा इशारा आझाद यांनीही दिला. त्यावेळी मोदी सरकार दलितविरोधी असल्याच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. काही सदस्य तर सभापतींसमोरील मोकळ्या जागेत येऊ न घोषणा देत होते. वरील प्रश्नांबरोबरच चीनची घुसखोरीच्या मुद्द्यावर मोदी सरकारला घेरण्याचा काँग्रेससह विरोधकांचा प्रयत्न आहे. त्याचे दर्शन पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच घडले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीवरून लोकसभाही तहकूबलोकसभेतही विरोधी सदस्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, दलितांवरील अत्याचार, गोरक्षकांकडून होणारा हिंसाचार आदी मुद्यांवरून प्रश्नोत्तराच्या तासात आणि नंतर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेचे कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. गोमाता बहाना है, कर्जमाफी से ध्यान हटाना है, विजय मल्या को भगाया, किसानों को रुलाया आदी घोषणांचे फलकही काही विरोधी सदस्य फडकावत होते. त्याच वेळी कर्नाटकातील प्रामाणिक पोलीस महानिरीक्षक (तुरुंग)डी. रूपा यांची बदली केल्याबद्दल भाजपचे सदस्य काँग्रेसचा निषेध करीत होते.