शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
2
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
3
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
4
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
5
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
6
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
7
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
9
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
10
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
11
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
12
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
13
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
14
'मिट्टी में मिला देंगे...', 'योगी'राजमध्ये आतापर्यंत किती गुन्हेगारांचा एन्काउंटर? पाहा आकडेवारी
15
"हे कुठून आले?"; किरीट सोमय्यांचं आकडेवारी बोट, व्होट जिहादबद्दल काय बोलले?
16
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले
17
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
18
"लाडक्या बहिणींना मदत करताना जाहिरातबाजी आणि चमकोगिरीची गरज काय?", काँग्रेसचा सवाल
19
भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
20
"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत 

"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 6:24 PM

दोन दिवसापूर्वी कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता भारताने प्रत्युत्तर दिले आहे.

दोन दिवसापूर्वी कॅनडानेभारतावर गंभीर आरोप केले होते, या आरोपानंतर आता भारतानेहीकॅनडावर आरोप केले आहेत. भारताकडून प्रत्यार्पणाच्या किमान २६ विनंत्या कॅनडाकडे अजूनही प्रलंबित आहेत. यावरुन भारताने कॅनडाला सुनावले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, '२६ जणांच्या प्रत्यार्पणाची प्रकरणे गेल्या दशकापासून किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित आहेत, असा आरोप त्यांनी केला. कॅनडामधील शीख फुटीरतावादी नेत्याच्या हत्येशी भारताचा संबंध जोडल्यानंतर या आठवड्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी बिघडले आहेत. 

बहराइच हिंसाचारातील ५ आरोपी अटकेत, एन्काऊंटरमध्ये दोन आरोपी जखमी

 रणधीर जैस्वाल म्हणाले, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांना अटक करण्याची विनंती कॅनडालाही केली होती, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही,'लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील सदस्यांच्या अटकेसाठी आम्ही कॅनडाला काही विनंत्या शेअर केल्या होत्या. त्यांनी आमच्या मुख्य समस्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. यामागे राजकीय हेतूही आहे, असाही आरोप केला. 

कॅनडाने कोणतेही पुरावे दिले नाहीत

यावेळी भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले. तसेच कॅनडाने आरोपाचे कोणतेही पुरावे दिले नसल्याचे म्हटले आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, चौकशीदरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेले हे भारतावरील आरोप  महत्त्वाचे आहेत हे दिसून येते. याआधी बुधवारी, ट्रूडो यांनी कबूल केले की त्यांच्याकडे फक्त गुप्तचर माहिती आहे आणि कोणतेही ठोस पुरावे नाहीत.  त्यांनी गेल्या वर्षी खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारच्या एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केला होता.

"सध्याचे संकट ट्रुडो सरकारच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे निर्माण झाले आहे.'भारताकडून प्रत्यार्पणाच्या २६ विनंत्या कॅनडाकडे एक दशक किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित आहेत, असंही रणधीर जयस्वाल म्हणाले.

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीJustin Trudeauजस्टीन ट्रुडो