शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 18:59 IST

संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत भाजपा खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि कल्याण बॅनर्जी यांच्यात वाद झाला

नवी दिल्ली - संसदेत केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक आणल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला, त्यानंतर हे विधयेक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं. आज या संयुक्त संसदीय समितीची बैठक झाली, त्यात मोठा राडा झाला आहे. भाजपा खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि विरोधी खासदारांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी रागाच्या भरात पाण्याने भरलेली काचेची बाटली टेबलावर फोडली. या घटनेनंतर टीएमसी खासदाराला एक दिवसासाठी समितीतून निलंबित करण्यात आलं आहे.

समितीच्या आजच्या बैठकीत बॅनर्जी आणि भाजपा खासदार यांच्यात वाद रंगला. यावेळी बॅनर्जींनी हा प्रकार केला, त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. ज्यामुळे प्राथमिक उपचारासाठी त्यांना बाहेर नेण्यात आले. बैठकीतून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी आणि आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह हे त्यांना बाहेर घेऊन जाताना दिसले. भाजपा खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समिती मंगळवारी सेवानिवृत्त न्यायाधीश आणि वकिलांच्या एका गटाशी चर्चा करत होती. त्यावेळी या विधेयकाशी यांचं काय देणेघेणे असा आक्षेप विरोधी खासदारांनी घेतला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये वाद सुरू झाला. 

नेमकं काय घडलं?

संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत भाजपा खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि कल्याण बॅनर्जी यांच्यात वाद झाला. ज्यात रागाच्या भरात कल्याण बॅनर्जी यांनी त्यांच्या टेबलाजवळ ठेवलेली काचेची पाण्याची बाटली जोरात आपटली. त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. जेपीसीच्या आजच्या बैठकीत कायदेशीर बाजू मांडणारे काही मंडळी आली होती. त्यावेळी कल्याण बॅनर्जी यांनी मला काही विचारायचं आहे असं म्हटलं तेव्हा अध्यक्षांनी तुम्ही याआधी खूप बोललात. आता नाही त्यानंतर खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यात वाद झाला. त्यानंतर हा प्रकार घडला. 

सोमवारीही झाला होता बैठकीत गोंधळ

वक्फ सुधारणा विधेयक २०२४ साठी बनवलेल्या संयुक्त संसदीय समितीची बैठक सोमवारीही घेण्यात आली. त्यावेळीही असाच गोंधळ झाला. जिथे अल्पसंख्याक मंत्रालयाच्या प्रेजेंटेशनवेळी सत्ताधारी भाजपा, एनडीएचे खासदार आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये जोरदार वादावादी झाली. वर्षभरापूर्वीपर्यंत केंद्र सरकारला हे विधेयक आणण्याची गरज दिसत नव्हती, आता अचानक हे विधेयक आणण्यात आले आहे असं या बैठकीत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सांगितले.  

टॅग्स :Parliamentसंसद