आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मेघालयमध्ये एका सभेत टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. 'ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसी (TMC) ला भाजपचा मित्रपक्ष म्हटले आहे, टीएमसी गोव्यात गेली आणि भाजपला फायदा झाला, असा दावा राहुल गांधी यांनी केला. आज मेघालय विधानसभेच् पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची आज पहिलीच रॅली होती. यावेळी त्यांनी टीएमसी पक्षावर टीका केली.
"तुम्हाला टीएमसीचा इतिहास माहित आहे, तुम्हाला बंगालमधील हिंसाचारही माहित आहे, ते गोव्यात आले आणि त्यांनी मोठा खर्च केला कारण त्यांना भाजपला मदत करण्याचे होते." मेघालयमध्ये भाजपची सत्ता यावी यासाठी टीएमसीची तयारी करत आहे, असंही काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.
'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' अन् 'मशाल' चिन्हाचं काय होणार?; सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश
'मी संसदेत भाषण केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही थेट प्रश्न विचारले. मी त्यांना अदानींसोबतच्या संबंधांबद्दल विचारले. मी एक फोटो देखील दाखवला ज्यामध्ये पंतप्रधान मोदी त्यांच्या विमानात अदानींसोबत बसले आहेत, पण त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.