शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

“मोदी सरकार केवळ हिंदू-मुस्लिमांना एकमेकांविरुद्ध उभं करण्याचं काम करतंय”: मेहबुबा मुफ्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 19:32 IST

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

जम्मू: केंद्रातील मोदी सरकारने अनुच्छेद ३७० रद्द केल्यापासून जम्मू आणि काश्मीरमधील नेतेमंडळी सातत्याने भाजप आणि मोदी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी सरकार केवळ हिंदू-मुस्लिमांना एकमेकांविरुद्ध उभे करण्याचे काम करत आहे. त्यांचा हा एकच कारखाना काम करतोय, अशी घणाघाती टीका मेहबुबा मुफ्ती यांनी केली. 

येत्या काही महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका, बेरोजगारी, हिंदू-मुस्लीम दंगली यावरून मेहबुबा मुफ्ती केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यांनी त्रिपुरा, नंतर उत्तर प्रदेश आणि आता महाराष्ट्रात सुरूवात केली. कारण, जसजशी उत्तर प्रदेशची निवडणूक जवळ येत आहे, त्यांच्याकडे दुसरे काही दाखवण्यासाठी नाही. ते केवळ याच आधारावर मत मागतात, या शब्दांत मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

त्यांचा एकच कारखाना काम करतो

तरूणांची सर्वांत मोठी समस्या बेरोजगारी आहे. केंद्रातील मोदी सरकारकडे यावर काहीच उपाय नाही. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. मात्र त्यांच्याकडे यावर काहीच उत्तर नाही. त्यांचा एकच कारखाना काम करतो. हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांविरुद्ध उभे करण्याचे, अशी टीका मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. 

दरम्यान, मेहबूबा मुफ्ती यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. अनंतनागमध्ये गेल्या आठवड्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या एका तरुणाच्या परिवाराला भेटायला जाऊ नये यासाठी त्यांना कैद केले असल्याचा दावा पीडीपी नेत्याने केला होता. 

टॅग्स :Mehbooba Muftiमेहबूबा मुफ्तीCentral Governmentकेंद्र सरकारJammu Kashmirजम्मू-काश्मीर