शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास, परीक्षा, निकालामुळे मानसिक तणाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 3:23 PM

देशातील ६वी ते १२वी इयत्तेतील ७३ टक्के विद्यार्थी शालेय जीवनाबद्दल काही प्रमाणात समाधानी आहेत. तर ३३ टक्के विद्यार्थ्यांना शालेय जीवन व शिक्षणात काहीतरी कमतरता असल्याचे जाणवत राहते. ते त्या वातावरणात दबून जातात. 

नवी दिल्ली : देशातील शालेय विद्यार्थ्यांपैकी ८१ टक्के विद्यार्थी अभ्यास, परीक्षा, निकाल यामुळे मानसिक तणावाखाली असतात. हा त्रास माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना जास्त जाणवतो. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) या संस्थेने नुकत्याच केलेल्या पाहणीत हा निष्कर्ष काढण्यात आला.

देशातील ६वी ते १२वी इयत्तेतील ७३ टक्के विद्यार्थी शालेय जीवनाबद्दल काही प्रमाणात समाधानी आहेत. तर ३३ टक्के विद्यार्थ्यांना शालेय जीवन व शिक्षणात काहीतरी कमतरता असल्याचे जाणवत राहते. ते त्या वातावरणात दबून जातात. 

ऑनलाइन पद्धतीने जे शिकविले जाते ते ५१ टक्के विद्यार्थ्यांना नीट उमजत नाही. शिक्षकांनी शिकविलेला धडा समजून घेण्यात त्यांना काही अडचणी येतात. 

३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत करण्यात आलेल्या या पाहणीत ३.७९ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. असे एनसीईआरटीने केलेल्या पाहणीच्या निष्कर्षात म्हटले आहे. 

शिक्षकांनी पुढाकार घेणे अपेक्षितकेंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केले आहे. त्यातील तरतुदींनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तम रितीने कसे शिकवावे याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. शिक्षकांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा बारकाईने वाचावा व त्यातील गोष्टींच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणे केंद्र सरकारला अपेक्षित आहे. 

सर्वेक्षण का केले?केंद्र सरकारने शिक्षक पर्व दरम्यान घेतलेल्या अनेक उपक्रमांसह हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. कोरोना महामारीनंतर देशातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्राने केलेले हे पहिले सर्वेक्षण आहे. शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आणि शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षक पर्व साजरे केले जात आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा