शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

रेल्वे प्रवासात महिलांच्या मदतीसाठी 'मेरी सहेली टीम', जाणून घ्या 139 नंबरवरून काय मदत मिळते?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 2:08 PM

Railway : रेल्वेत एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांवर आरपीएफची 'मेरी सहेली टीम' लक्ष ठेवते. विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही महिलांशी संपर्क साधला जातो.

नवी दिल्ली : देशातील भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) कोणत्याही ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी भारतीय रेल्वेकडून मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम आरपीएफद्वारे (Railway Police Force) चालविली जाते. रेल्वेत एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांवर आरपीएफची 'मेरी सहेली टीम' लक्ष ठेवते. विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही महिलांशी संपर्क साधला जातो. यादरम्यान महिला प्रवाशांना जागरूक करण्यासाठी माहिती दिली जाते आणि हेल्पलाइन क्रमांक 139 वर देखील माहिती दिली जाते. या हेल्पलाइनद्वारे महिलांना काय मदत दिली जाते ते जाणून घेऊया. 

देशातील एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नोकरी करणाऱ्या आणि घरगुती महिलांची वारंवार ये-जा असते. सण-उत्सवात हे उपक्रम वाढतात. लांबच्या प्रवासात अनेक महिला चिंताग्रस्त असतात, त्यामुळे त्यांच्यापेक्षा त्यांचे कुटुंबीय जास्त काळजीत असतात. जोपर्यंत प्रवास सुरक्षितपणे पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही चिंतेवर उपाय नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मेरी सहेली मोहीम सुरू केली आहे. ज्या अंतर्गत विविध स्थानकांवर मेरी सहेली टीम तयार करण्यात आल्या आहेत. ही पथके महिलांना विविध गुन्ह्यांबाबत आणि मदतीसाठी हेल्पलाइनद्वारे जागरूक करत असतात.

याशिवाय, महिलांनी कोणत्याही अडचणीच्या वेळी 139 हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केल्यास त्यांना तत्काळ प्रतिसाद दिला जातो. शक्य ती सर्व मदत ताबडतोब पोहोचवणाऱ्या मेरी सहेली टीम आतापर्यंतच्या विविध कामांमुळे चर्चेत आल्या आहेत. मेरी सहेली टीम लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिलांची माहिती गोळा करते. या माहितीमध्ये पीएनआर क्रमांक, बोगी क्रमांक, ट्रेन क्रमांक इ. यानंतर महिलांशी संपर्क साधला असता त्यांना येणाऱ्या अडचणीही नोंदवल्या जातात. महिलांसोबतच ते मुलींनाही तातडीची मदत करतात.

गर्भवती महिलांना दवाखान्यात नेण्यासाठी असो की ट्रेनमधील बदमाशांना धडा शिकवण्यासाठी. प्रत्येक बाबतीत ही टीम सक्रिय सुद्धा असते. तसेच अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या टोळ्या, विनयभंग आणि कोणत्याही गुन्ह्याच्या समस्येत तरुणींना सुरक्षा प्रदान करते. अशा परिस्थितीत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि मुलींना सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. मेरी सहेली टीमची एक हृदयस्पर्शी झलक देखील पहायला मिळते की, देशाच्या विविध भागात घरातून पळून गेलेल्या महिला आणि भगिनींना आपल्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गरोदर महिलांना मदत करताना, रस्ता चुकलेल्या किंवा घरातून पळून गेलेल्या शेकडो महिलांना समुपदेशनानंतर घरी पाठवण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेWomenमहिलाIndian Railwayभारतीय रेल्वे