शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला होता गोळीबार
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
5
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
6
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
7
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
8
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
9
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
10
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
11
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
12
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
13
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
15
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
16
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
17
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
18
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
19
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
20
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

राष्ट्रीय महामार्गांवरील स्पीड ब्रेकर्स हटवण्याचा रस्ते वाहतूक मंत्रालयाचा आदेश

By admin | Published: April 15, 2016 12:15 PM

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसंच अपघात होण्यासाठी कारणीभूत ठरणा-या स्पीड ब्रेकरला राष्ट्रीय महामार्गांवरुन हटवण्याचा आदेश दिला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १५ - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्पीड ब्रेकर्स राष्ट्रीय महामार्गांवरुन हटवण्याचा आदेश दिला आहे. 
वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसंच अपघातांची संख्या कमी करण्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), राज्यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आणि सीमा रस्ते संघटनेला (बीआरओ) हे आदेश दिले आहेत.
 
रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व विभागांना बुधवारपर्यंत आपल्या कामकाजाची माहिती देण्यास सांगितलं आहे. रस्ते अपघातासंबंधी मंत्रालयाने 2014 मध्ये अहवाल दिला होता.  अहवालानुसार 4726 लोकांनी रंगीत पट्ट्यांमुळे (हंप्स) झालेल्या अपघातात आपला जीव गमावला आहे. तर 6672 लोकांचा खड्डे आणि स्पीड ब्रेकरमुळे झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे.
 
रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकात स्थानिक प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. मार्गदर्शक तत्वे जारी केलेली असतानाही वाहनांचा वेग कमी कऱण्यासाठी स्पीड ब्रेकर बांधले जात असल्याचं म्हटलं आहे. यावर मंत्रालयाने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणे अपेक्षित असतं. स्पीड ब्रेकरमुळे गंभीर अडथळा होऊन वेगाने जाणा-या वाहनांचा अपघात होऊ शकतो असं मत मंत्रालयाने व्यक्त केलं आहे. 
 
आंतरराष्ट्रीय रस्ते फेडरेशनचे चेअरमन कपिला यांनी हायवेवर स्पीड ब्रेकर नसावेत याचं समर्थन केलं आहे. पण काही हायवे गावातून जातात जिथे लोकांना पलीकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडावा लागतो. त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याची गरज असल्याचंही कपिला बोलले आहेत.