शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

वायनाडमध्ये चमत्कार! भूस्खलनाच्या चौथ्या दिवशी चारजण जिवंत सापडले, आतापर्यंत ३०८ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 12:04 PM

भूस्खलनाच्या बाजुलाच मोठी नदी देखील आहे. या नदीतही शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेले मृतदेह नदीत आणि जंगलातही सापडत आहेत.

केरळच्या वायनाडमध्ये ३० जुलैच्या पहाटे भला मोठा डोंगर चार गावांवर कोसळला होता. या घटनेला आज चार दिवस होत आलेत. तो चिखल, पाणी आणि दरड पाहून आता कोणी जिवंत सापडेल अशी आशा वाटत नव्हती. रेस्क्यू ऑपरेशन तरीही सुरुच होते. बघता बघता मृतदेहांच्या आकड्याने ३०० चा आकडा पार केला. अद्यापही अनेक लोक या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत किंवा पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले आहेत. असे असताना एक चमत्कार घडला आहे. 

वायनाडमध्ये बचाव कार्य करत असलेल्या भारतीय सैन्याच्या तुकडीला मातीच्या ढिगाऱ्याखालून चार जण जिवंत सापडले आहेत. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरूष आहेत. लँडस्लाईडनंतर ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. पदावेट्टी कुन्नू गावातून त्यांना वाचविण्यात आले आहे. यामुळे रेस्क्यू टीमच्या आशा पल्लवीत झाल्या असून आणखी काही जण जिवंत सापडतील या आशेने कामाचा वेग वाढविण्यात येत आहे. 

आतापर्यंत ३०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १९५ जणांचेच मृतदेह सापडले असून उर्वरित व्यक्तींचा शरीराचा कोणता ना कोणता भाग सापडला आहे. या १०५ लोकांच्या शरीराचा काही भाग रेस्क्यू टीमला सापडला आहे. यावरून त्यांचा मृत्यू झाल्याचे ठरविण्यात आले आहे. 

भारतीय सैन्य, नेव्ही, एअरफोर्स, एनडीआरएफ, एसडीआरएफसह ४० टीम या रेस्क्यू ऑपरेशनसाठी काम करत आहेत. हा भाग मोठा असल्याने सहा भागात त्याची वाटणी केली जाणार आहे. जेणेकरून ज्या भागात आतापर्यंत पोहोचता आले नाही, तिथे लवकर मदत मिळाली तर आणखी काही लोक जिवंत सापडू शकतील अशी आशा आहे. तसेच हिंडन एअरबेसवरून सी-130 विमानातून ड्रोनद्वारे मातीखाली गाडले गेलेल्या लोकांना शोधण्यात येणार आहे. याचीही तयारी हिंडनमध्ये सुरु झाली आहे. 

भूस्खलनाच्या बाजुलाच मोठी नदी देखील आहे. या नदीतही शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेले मृतदेह नदीत आणि जंगलातही सापडत आहेत. यामुळे या भागात हेलिकॉप्टरही सर्च ऑपरेशनसाठी तैनात करण्यात आली आहेत. वन विभागाचे कर्मचारीही बोलावण्यात आले आहेत. 

टॅग्स :landslidesभूस्खलनKeralaकेरळ