शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

विरोधकांचे गैरवर्तन, नायडूंच्या डोळ्यांत अश्रू; संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 15:24 IST

नव्या कृषी कायद्यांवर राज्यसभेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच लावून धरली होती.

हरिश गुप्ता -

नवी दिल्ली : राज्यसभेत विरोधी पक्षांतील काही सदस्यांनी केलेल्या गैरवर्तन व गदारोळाबद्दल सभापती व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी तीव्र संताप व्यक्त केला. त्यावेळी नायडू खूप भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळून ते काही सेकंद बोलू शकले नाहीत. राज्यसभेतील सदस्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे अस्वस्थ होऊन मी रात्रभर झोपू शकलो नाही असेही ते म्हणाले. विरोधकांच्या गदारोळाबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी संपणार होते. नव्या कृषी कायद्यांवर राज्यसभेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच लावून धरली होती. मात्र त्याऐवजी कृषीविषयक समस्या व उपाययोजना या विषयावर चर्चा करण्यास मंगळवारी संमती देण्यात आली. या निर्णयाचा निषेध करताना काही विरोधी सदस्य राज्यसभेत जिथे पत्रकार, अधिकारी बसतात, त्या टेबलांवर चढून घोषणा देऊ लागले. एका खासदाराने कामकाजातील एक फाईल सभापतींच्या दिशेने भिरकावली होती. राज्यसभेचे बुधवारी कामकाज सुरू होताच सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले की, सभापतींचे आसन व त्याजवळील भाग हा एक प्रकारे राज्यसभेचा गाभारा आहे. त्यासहित सर्व सभागृहाचे पावित्र्य खासदारांनी कायम राखले पाहिजे. 

अपेक्षेइतके काम नाहीलोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत जितके काम होणे अपेक्षित होते तितके होताना दिसत नाही. या अधिवेशनात काळात आतापर्यंत या सभागृहाचे फक्त २२ तासच काम झाले आहे. विरोधकांच्या गदारोळाचे कारण देऊन लोकसभेचे कामकाज ओम बिर्ला यांनी अनिश्चित काळासाठी तहकूब केले.  

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस