शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मिस्कील शैलीत मोदींचे काँग्रेसवर चौफेर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2016 2:52 AM

‘जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक काम करतो आणि दुसरा त्याचे श्रेय घेतो यापैकी पहिल्या प्रकारची व्यक्ती बनण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, कारण त्यात सर्वात कमी स्पर्धक असतात

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली‘जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक काम करतो आणि दुसरा त्याचे श्रेय घेतो यापैकी पहिल्या प्रकारची व्यक्ती बनण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, कारण त्यात सर्वात कमी स्पर्धक असतात.’ दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या या विधानांचा दाखला देत, पंतप्रधान मोदींनी बुधवारी राज्यसभेत काहीशा मिस्कील शैलीत पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुलची विकेट घेतली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलतांना ईपीएफवरील करप्रस्ताव सरकारने मागे घेतल्यानंतर राहुल गांधींनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर पंतप्रधानांचे हे भाष्य होते.राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदींचा आवेश लोकसभेसारखा आक्रमक नव्हता. मात्र, काँग्रेसची खिल्ली उडवण्याची एकही संधी त्यांनी बुधवारी सोडली नाही. आपल्या भाषणात काँग्रेसवर मिस्कील वार करताना दिवंगत शायर निदा फाजलींच्या शायरीच्या खालील ओळी मोदींनी उद्धृत केल्या.सफर में धूप तो होगी...जो चल सको तो चलो...सभी है भीड में... तुम भी निकल सको तो चलो...किसी के वास्ते राहें कहां बदलती है... तुम अपने आप को खुदही बदल सको तो चलो....यहां किसि को कोई रास्ता नही देता...मुझे गिराकर अगर तुम संभल सकते हो... तो चलो...जवळपास तासभराच्या भाषणाची अत्यंत संयत स्वरात सुरूवात करीत यंदाच्या अधिवेशनात गोंधळाविना चांगले कामकाज झाल्याबद्दल पंतप्रधानांनी विरोधकांसह सर्वांचे सुरूवातीलाच आभार मानले. निश्चित धोरणांचा पाठपुरावा करीत सरकारने कामकाज कशाप्रकारे चालवले आहे, याचे अनेक दाखले पंतप्रधानांनी दिले.