शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी मान्य न करणं ही चूक; भाजपा खासदाराची कबुली 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 7:46 PM

सुब्रम्हण्यम स्वामी हे अनेकदा भाजपाविरोधात भूमिका घेण्यासाठीही ओळखले जातात.

नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाचा फटका शिवसेना-भाजपा युतीला बसला. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना युतीत तणाव निर्माण झाला त्यामुळे राज्यात भाजपाला सत्ता गमवावी लागली. महाराष्ट्रासारखं राज्य भाजपाच्या हातून निसटलं. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सत्ता आणली. मात्र शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देणं ही भाजपाची चूक होती अशी कबुली भाजपाचे खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी दिली आहे. 

न्यूज १८ इंडियाच्या कार्यक्रमात बोलताना सुब्रम्हण्यम स्वामी म्हणाले की, शिवसेना हा भाजपाचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र होतो. शिवसेनेला दूर करणे योग्य झालं नाही. जुन्या मित्रपक्षाला टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायला हवं होतं. मात्र तसं झालं नाही. शिवसेनेने आमची साथ सोडली असं त्यांनी बोलून दाखविले. 

सुब्रम्हण्यम स्वामी हे अनेकदा भाजपाविरोधात भूमिका घेण्यासाठीही ओळखले जातात. मागील आठवड्यात त्यांनी घसरलेल्या अर्थव्यवस्थेवरुन भाजपा सरकारला घरचा आहेर दिला होता. अर्थव्यवस्थेला रुळावर आणता आले नाही, तर राम मंदिराचा विजयही पक्षाला तारू शकणार नाही, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते. 

'हफपोस्ट इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सुब्रमण्यम स्वामींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. भाजपा खासदारानं पक्षालाचा इशारा देत सांगितलं होतं की, देशातली आर्थिक स्थिती एवढी वाईट आहे की त्याचा फटका भाजपाला दिल्ली आणि झारखंडच्या निवडणुकीत बसणार आहे. अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर आणण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे. मोदींच्या परदेश दौऱ्यावर निशाणा साधत ते म्हणाले, याचा फायदा दिसत नाही. झारखंडमध्ये सरयू राय यांच्यावर कारवाई करण्यात आली, खरं तर प्रामाणिकपणा पाहता त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे. अयोध्या निर्णयाचा लाभ भाजपाला वाईट अर्थव्यवस्थेमुळे मिळणार आहे?, राम मंदिर बनणार असल्यानं मिठाई वाटप केलं जात आहे. त्यासाठी रॅलींचं आयोजनही केलं जात आहे. एक व्यक्ती स्वतःच्या मुलीची फीसुद्धा भरू शकत नाही. चांगल्या धोरणांनी वाईट परिस्थिती बदलता येऊ शकते अशी टीका त्यांनी केली होती.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री