शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

Rahul Gandhi : "पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्रायलची जास्त काळजी आणि...", राहुल गांधींचा निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 16:26 IST

मिझोरामधील निवडणुकीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी येथील आयझॉलमधील राजभवनाजवळील एक सभेला संबोधित केले. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (१६ सप्टेंबर) मणिपूर हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींना इस्रायलची जास्त काळजी आहे, असे सांगत भाजप केवळ द्वेष पसरवण्याचे काम करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, मिझोरामधील निवडणुकीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी येथील आयझॉलमधील राजभवनाजवळील एक सभेला संबोधित केले. 

यावेळी, मणिपूर आता एक राज्य राहिले नाही, तर जातीच्या आधारावर दोन राज्यांमध्ये विभागले आहे. १९८६ मध्ये शांतता करारावर स्वाक्षरी करून बंडखोरीग्रस्त ईशान्येकडील राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला होता, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला इस्रायलमध्ये काय घडत आहे? याबद्दल अधिक स्वारस्य आहे, परंतु मणिपूरमध्ये काय घडत आहे, याची त्यांना चिंता नाही, हे आश्चर्यकारक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

मणिपूरमध्ये लोक मारले जात आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच, एकमेकांचा आदर करणे, सहिष्णुता बाळगणे, एकमेकांच्या धर्म आणि भाषेतून शिकणे ही भारताची विचारधारा आहे, मात्र भाजप त्यावर हल्ला करत आहे. भाजप द्वेष आणि हिंसाचार पसरवत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तर, मे महिन्याच्या सुरुवातीला मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाला होता.

हमास-इस्रायल यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवसदरम्यान, ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा आज दहावा दिवस आहे. हमासच्या ठिकाणांवर इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच आहेत. त्याचवेळी गाझा पट्टीतून हमास आणि लेबनानमधून हिजबुल्लाह इस्त्रायलवर सातत्याने रॉकेट डागत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये आतापर्यंत २७९९ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ७२४ हून अधिक मुलं आणि ३७० हून अधिक महिलांचा समावेश आहे. तर १० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा