शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

‘मनरेगा’त आता स्थायी संपत्ती निर्मितीवर भर

By admin | Published: July 31, 2014 11:56 PM

आधीच्या ‘संपुआ’ सरकारने सुरु केलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) सुरु राहणार की नाही

नवी दिल्ली : आधीच्या ‘संपुआ’ सरकारने सुरु केलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) सुरु राहणार की नाही याविषयीची संदिग्धता दूर करत मोदी सरकारने ही योजना सुधारित निकष लागू करून व भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे उपाय योजून यापुढेही सुरु ठेवण्याचे ठरविले आहे.लोकसभेत ‘मनरेगा’वर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ग्रामीण विकासमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली व या योजनेला महात्मा गांधी यांचे नाव असल्याने ती सुरु ठेवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.या योजनेतील कामांमुळे रोजगार उपलब्ध होण्यासोबतच ग्रामीण भागांमध्ये स्थायी सामाजिक संपत्तीचीही निर्मिती व्हावी यासाठी ‘मनरेगा’ कामांवर होणाऱ्या खर्चाचे साधने व मजुरी यांचे गुणोत्तर बदलण्यात येणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले. सध्या खर्चाचा ६० टक्के हिस्सा मजुरीचा व ४० टक्के हिस्सा साधनांचा असतो. आता हा गुणोत्तर ४९ टक्के मजुरी व ५१ टक्के साधने असे करण्यात येणार आाहे. यामुळे मूल्यवर्धित स्वरूपाची कामे होतील.खर्चाचे हे गुणोत्तर आता गाव पातळीऐवजी जिल्हा पातळीवर ठरविले जाईल, असेही मंत्र्यांनी सांगितले.आधीच्या संपुआ सरकारने निवडणुका डोळ््यापुठे ठेवून ही योजना घाईगर्दीत तयार केल्याने त्यात बऱ्याच उणिवा व त्रुटी आहेत व त्या आमचे सरकार दूर करील, असेही त्यांनी सांगितले.‘मनरेगा’ कामांच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी उपग्रहाच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल व त्यादृष्टीने हैदराबाद येथील संस्थेसोबत बैठकही झाली आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)