शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

जमावाच्या मारहाणीत दोन अतिरेकी ठार, पाच मजुरांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 05:52 IST

आसाममधील तीनसुकिया जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी गुरुवारी पाच बंगाली मजुरांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर या राज्याच्या कचर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी संतप्त जमावाने केलेल्या जबर मारहाणीत दोन दहशतवादी ठार झाले.

सिलचर : आसाममधील तीनसुकिया जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी गुरुवारी पाच बंगाली मजुरांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर या राज्याच्या कचर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी संतप्त जमावाने केलेल्या जबर मारहाणीत दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून काही शस्त्रे व दारूगोळा पोलिसांनी जप्त केला.हरीनगर येथील बसस्टॉपवर संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत हे दोेघे संशयित दहशतवादी गंभीर जखमी झाले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सिलचर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दोघांकडून तीन एके-५६ रायफली, चिनी बनावटीची एलएमजी बंदूक, एक रायफल असा शस्त्रसाठा व दारूगोळा जप्त करण्यात आला. ठार झालेले दहशतवादी दिमा हसाओ जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.तीनसुकिया येथे दहशतवाद्यांनी ठार केलेल्यांच्या कुटुंबियांची तृणमूल काँग्रेसच्या चार सदस्यीय शिष्टमंडळाने रविवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या हल्ल्यामागील गुन्हेगारांना शोधून त्यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणीही या पक्षाने केली.ठार झालेल्यांच्या कुटुंबांतील वारसदारांना प्रत्येकी एक लाख रुपयाची मदत या पक्षाने दिली आहे. या शिष्टमंडळात पक्षाचे नेते डेरेक ओब्रियन, लोकसभा खासदार ममता बाला ठाकूर, राज्यसभा खासदार नदिमूल हक व आमदार महुआ मोईत्रा यांचा समावेश होता.या हत्याकांडाचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही तीव्र निषेध केला होता. नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) प्रकाशित करण्यासाठी हालचाली सुरू असताना सिलचर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेण्याकरिता तृणमूल काँग्रेसच्या सहा खासदारांचे शिष्टमंडळ २ आॅगस्ट रोजी तिथे गेले होते; पण त्यांना विमानतळावरच अडविण्यात येऊन दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्यांना परत पाठवून दिले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Assamआसाम