शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
3
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
4
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...
5
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
6
"महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेला", विजय वडेट्टीवारांची टीका
7
Gold Silver Price 19 Sep: सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र चमकली; पाहा नवे दर
8
‘’पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा, मग…’’, कलम ३७० वरून ओमर अब्दुल्लांचं प्रत्युत्तर   
9
अक्षय अन् अमिताभ हे सरकारी जाहिरातींसाठी किती मानधन आकारतात ? ऐकून बसेल धक्का!
10
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
11
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
12
अभिनयच नाही तर बिझनेस मध्येही हिट! माधुरी दीक्षितनं 'या' कंपनीत केली कोट्यवधींची गुंतवणूक
13
मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह 
14
जग्गू दादाचा वर्षा उसगांवकरांना पाठिंबा, कौतुकही केलं, म्हणाले "तू भारीच आहेस, Good Luck"
15
Video - सेल्फीचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर उभा असताना आली ट्रेन, 1 सेकंद उशीर झाला असता तर...
16
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
17
कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान
18
"लॉरेन्स बिश्नोईला पाठवू?" भल्या पहाटे सलीम खान यांना धमकी, बुरखाधारी महिलेने रस्ता अडवून...
19
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
20
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"

"मोदी बाबू, बंगाल जळाला तर दिल्लीच्या खुर्चीला हादरे बसतील", ममता बॅनर्जींचा इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:04 PM

Mamata Banerjee Warns Narendra Modi: काल भाजपाने पुकारलेल्या बंगाल बंददरम्यान झालेलं तीव्र आंदोलन आणि जाळपोळीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या संतप्त झाल्या आहेत.त्यांनी बंगालमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच इशारा दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोलकात्यामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. मात्र आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलं असून, विरोधकांकडून ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच या घटनेविरोधात काल भाजपाने पुकारलेल्या बंगाल बंददरम्यान झालेलं तीव्र आंदोलन आणि जाळपोळीमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या संतप्त झाल्या आहेत.त्यांनी बंगालमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच इशारा दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपाने पुकारलेल्या भारत बंददरम्यान झालेलं तीव्र आंदोलन आणि जाळपोळीवरून ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, काही लोकांना वाटतंय की हा बांगलादेश आहे. मला बांगलादेश आवडतो, तिथले लोक आमच्यासारखंच बोलतात. बांगलादेश आणि बंगालची संस्कृती एकच आहे. मात्र बांगलादेश हा वेगळा देश आहे आणि भारत हा वेगळा देश आहे, हे लक्षात ठेवा.  मोदी बाबू तुम्ही तुमच्या पक्षाला सांगून आग लावत आहात. लक्षात ठेवा, जर बंगालमध्ये आग लावाल तर आसाम गप्प बसणार नाही. पूर्वोत्तरेतील राज्यही शांत राहणार नाहीत. तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि ओदिशाही शांत राहणार नाही. दिल्लीसुद्धा शांत राहणार नाही. तुमची खुर्ची हलवून टाकू, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.

ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनी आयोजित एका सभेमध्ये केलं. ममता बॅनर्जींच्या विधानानंतर बंगालमधील वातावरण तापलं आहे. तसेच भाजपाने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

बदला नाही तर बदलाची आपली जुनी घोषणा विसरून ममता बॅनर्जी ह्या विरोधी पक्षांना धमकावण्याचं काम करत आहेत, असा आरोप भाजपाने केला. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते सुकांत मुजुमदार यांनी ममता बॅनर्जी यांनी केलेलं विधान धमकीपूर्ण असल्याची टीका करत त्याचा निषेध केला. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहून ममता बॅनर्जी ह्या महत्त्वाच्या पदावर राहण्यासाठी पात्र राहिल्या नसल्याचे सांगितले. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या विधानावर ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही टीका केली. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा