शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

मोदी सरकारने केला ‘एचएएल’चा अपमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 06:21 IST

राहुल गांधीनी साधला कर्मचाऱ्यांशी थेट संवाद

बंगळुरू : हवाईदलासाठी ‘राफेल’ लढाऊ विमानांचे उत्पादन करणे हा ‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लि.’ (एचएएल) कंपनीचा हक्क आहे. या कंपनीने आत्तापर्यंत देशाच्या संरक्षण दलांसाठी बजावलेली चोख भूमिका पाहता देशाचे ते या कंपनीला लागू असलेले देणे आहे. परंतु हे काम हिरावून घेऊन सरकारने राष्ट्रीय कंपनीचा अपमान केला, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली.

राफेल विमानांच्या सौद्यावरून सध्या सुरु असलेल्या राजकीय रणकंदनाला नवे वळण देत राहुल गांधी यांनी या कंपनीच्या आजी-माजी कर्मचाºयांशीच थेट संवाद साधला.कर्मचाºयांना उद्देशून ते म्हणाले की, सरकारकडून मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीने तुमचे मन दुखावले हे मी जाणतो. सरकार काही तुमची माफी मागणार नाही. पण माझा काही संबंध नसला तरी मी तुमची माफी मागतो. मी इथे तुमच्या भावना जाणून घेण्यासाठी आलो आहे, जेणेकरून सत्तेवर आल्यावर आम्हाला त्याचे परिमार्जन करता येईल.

ते म्हणाले की, ‘एचएएल’ भारताची ‘सामरिक संपत्ती’ आहे. स्वातंत्र्यानंतर अशा अनेक सामरिक संपत्तींची उभारणी करण्यात आली. परंतु आता त्या पद्धतशीरपणे मोडीत काढल्या जात आहेत.

राहुल गांधी पत्रकारांना म्हणाले की, ‘एचएएल’ला विमान उत्पादनाचा ७० वर्षांचा अनुभव असूनही त्यांना अनुभव नाही, असे संरक्षणमंत्री म्हणतात. पण राफेलचे काम ज्यांना दिले, त्या अनिल अंबानींना यांचा अनुभव १२ दिवसांचा आहे. ‘एचएएल’वर कर्ज नाही. अंबानींच्या डोक्यावर ४५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे.

भाजपाचा पलटवारराहुल गांधी यांच्या आरोपांवर पलटवार करताना भाजपा मंत्र्याने सांगितले की, आमचे सरकार आल्यापासून ‘एचएएल’ला दरवर्षी २२ हजार कोटी रुपयांची कामे दिली जात आहेत. आधीच्या ‘संपुआ’च्या काळात वर्षाला १० हजार कोटी रुपयांची कामे दिली जात. शिवाय ‘राफेल’चे काम ‘एचएएल’लाच मिळावे यासाठी आग्रही असणाऱया काँग्रेसने स्वत:च्या सत्ताकाळात हा करार सात वर्षे का रखडत ठेवला? (वृत्तसंस्था)

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधी