शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

आता मोदी सरकार 25 रुपये किलोने विकणार तांदूळ?; जाणून घ्या, कुठे करता येणार खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 16:44 IST

सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं सरकारचं म्हणणं आहे.

पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि मोदी सरकार याच दरम्यान सातत्याने नवनवीन निर्णय घेत आहे. आता नववर्षाला सर्वसामान्यांना स्वस्त दरात तांदूळ उपलब्ध करून देण्याची योजना आखली जात आहे. सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं सरकारचं म्हणणं आहे. 25 रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येईल. यापूर्वी याच धर्तीवर केंद्र सरकार देशभरातील जनतेला पीठ आणि चणा डाळ उपलब्ध करून दिली आहे. भारत राइस (Bharat Rice) या नावाने तांदूळ दिला जाऊ शकतो.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही धान्याच्या किमती वाढल्या तर जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी योजना सरकारने नेहमीच आखली आहे. लाइव्ह मिंटच्या म्हणण्यानुसार, ही योजना सुरू केल्यास, राष्ट्रीय कृषी सहकारी मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED), नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) आणि केंद्रीय भंडार आउटलेट्स यांसारख्या सरकारी संस्थांना सवलतीच्या दराने तांदूळ विकला जाईल. मोबाईल व्हॅनद्वारे विक्री केली जाईल.

सरकारने हे पाऊल अशा वेळी उचललं आहे जेव्हा अन्नधान्य महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये 6.61 टक्के आणि गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये 4.67 टक्क्यांच्या तुलनेत 8.7 टक्के होता. NSO च्या आकडेवारीनुसार याच कालावधीत धान्याच्या किमती 10.3 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई वाढली

खाद्यपदार्थांच्या चढ्या किमतींमुळे नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई 5.55 टक्के होती. ऑक्टोबरमध्ये 4.87 टक्के होती. ऑगस्टमध्ये महागाईत घट झाली होती आणि त्यादरम्यान किरकोळ महागाई 6.83 टक्क्यांवर पोहोचली होती. नोव्हेंबर 2022 मध्ये किरकोळ महागाईचा दर 5.88 टक्के होता.

पीठ आणि चणा दाळ

सध्या देशातील 2000 हून अधिक रिटेल पॉईंट्सवर केंद्र सरकार 27.50 रुपये प्रति किलो दराने 'भारत आटा' म्हणजेच पीठ आणि 60 रुपये प्रति किलो दराने चणा डाळ विकत आहे. गव्हाचं पीठ आणि चणा डाळ 2,000 हून अधिक केंद्रांवर विकली जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी