शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

मोदी सरकार म्हणजे ‘आॅर्डिनन्स राज’

By admin | Published: January 14, 2015 5:17 AM

मोदी सरकार म्हणजे ‘आॅर्डिनन्स राज’ असे संबोधत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वहहुकूमाआड लोकशाही मूल्यांचे उल्लंघन होत असल्याची तसेच राष्ट्रीयीकरणाच्या मूळ उद्देशाचा पराभव झाल्याची टीका केली

नवी दिल्ली : मोदी सरकार म्हणजे ‘आॅर्डिनन्स राज’ असे संबोधत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वहहुकूमाआड लोकशाही मूल्यांचे उल्लंघन होत असल्याची तसेच राष्ट्रीयीकरणाच्या मूळ उद्देशाचा पराभव झाल्याची टीका केली. मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन आणि अन्य वटहुकुमांना जोरदार विरोध करण्याचा निर्धार हे मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचे वैशिष्ट्य राहिले. मात्र पक्षाचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्यावरील जबाबदारीच्या विस्ताराचा विषय या बैठकीत निघालाच नाही.बैठकीचा प्रारंभ करतानाच सोनिया यांनी मोदी सरकारवर सडेतोड टीका केली. संपुआ सरकार घटनात्मक मत अजमावत निर्णय घेत होते. वटहुकूम हा न्यायालयीन प्रक्रियेतील अखेरचा उपाय ठरत असताना मोदी सरकार मात्र सुप्रशासनाच्या नावाखाली वटहुकुमाचा धोकायदायक वापर करीत आहे, असे त्या म्हणाल्या. यापूर्वीच्या संपुआ सरकारने भूसंपादन कायदा दीर्घ चर्चा आणि सल्लामसलत करून आणला होता़ मोदी सरकारने त्यात हवी ती दुरुस्ती घडवून आणण्यासाठी वटहुकुमाचा आधार घेतला आहे. ऐतिहासिक भूसंपादन विधेयकाची पूर्णपणे वाट लावत ब्रिटिशांनी पारित केलेला कायदा मागील दाराने आणला आहे. वटहुकूम आणण्याची एवढी घाई का? त्यामागे छुपा हेतू असल्याचा प्रश्न उपस्थित होतो. कोळसा खाणींसंबंधी वटहुकुमामुळे कोळसा खाणींच्या राष्ट्रीयीकरणाच्या मूळ उद्देशालाच तडा गेला आहे, असेही त्या म्हणाल्या.