शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोदी सरकार मच्छिमारांसाठी लवकरच मोठा निर्णय घेणार?; केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 14:32 IST

केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांची माहिती

- मनोहर कुंभेजकर

नवी दिल्ली- मासेमारीला कृषीचा दर्जा द्यावा या कोळी महासंघाच्या मागणीला दुजोरा देताना,केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला म्हणाले की, मोदी सरकार मासेमारांना कृषीचा दर्जा देण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे. त्यादृष्टीने  अंमलबजावणीला आम्ही सुरुवात केली असून किसान क्रेडिट कार्ड सारखी योजना फक्त शेतकऱ्यांना होती, मात्र आम्ही ती मच्छिमारांना ही लागू केली आहे. ही योजना सरसकट मच्छीमारांना मिळावी बिगर यांत्रिक मासेमारांना ही मिळावी म्हणून बँक प्रणालीशी आमची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील काळात कृषी च्या सर्व योजना मासेमारांना लागू करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय समुद्र आणि मासेमारी सातत्याने दुर्लक्षित राहिल्याने भारतीय सागरी मासेमारी बिल 2021 हे आणले असून  देशाच्या विकासासाठी हे बिल फायदेशीर ठरेल असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी केले.

कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा विधान परिषदेचे सदस्य रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकतीच नवी दिल्ली येथील कृषी भवनच्या मंत्री महोदयांच्या दालनात त्यांची भेट घेतली. संसदेत येऊ घातलेल्या मासेमारी बिलावर कोळी महासंघाने हरकती आणि सूचना मांडल्या होत्या. आमदार रमेश पाटील यांनी लोकमतला याबाबत सविस्तर माहिती दिली.

या शिष्टमंडळाला मध्ये कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कोळी महासंघाचे उपाध्यक्ष देवानंद भोईर, भाजपा महाराष्ट्र मच्छीमार सेलचे अध्यक्ष ॲड चेतन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 भारतीय सागरी मासेमारी बिल मच्छीमारांच्या हिताचे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मासेमारांच्या सर्व सूचना आणि योग्य हरकतींचा यामध्ये समाविष्ट करूनच हे बिल लागू केले जाणार असून मासेमारांना विकासाची मोठी संधी याद्वारे मिळणार असल्याचे  रुपाला यांनी सांगितले..

या बिलावर राज्यांच्या सागरी 12 नॉटिकल मैल हद्दीची मर्यादा वाढवून वीस नॉटिकल मैल पर्यंत विस्ताराव्यात अशी मागणी यावेळी कोळी महासंघाने केली असता त्यांनी आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे अवलोकन आपल्याला करावे लागेल असे स्पष्ट केले. त्याच बरोबर निरनिराळया कलमांवर या बैठकीत चर्चा झाली.

पारंपारिक आणि छोटा, मध्यम मच्छिमार सातत्याने दुर्लक्षित असल्याचे निदर्शनास आणून वातावरणातील बदलांचा परिणाम मासेमारीवर आणि या घटकांवर होत असल्याचे शिष्टमंडळाने त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या सगळ्या बाबींवर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत असून मच्छिमारांच्या हिताच्या योजना लागू करण्यात केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या व्यतिरिक्त यामध्ये कोणत्या योजनांचा समाविष्ट असावा, कशा पद्धतीने असाव्यात अशा सूचना कोळी महासंघाने पुढाकार घेऊन मांडाव्यात अशी सूचना मंत्रीमहोदयांनी  शिष्टमंडळाला केली. या दृष्टीने लवकरच जाणकार मच्छीमारांशी चर्चा करून मासेमारांच्या जीविताची, मालमत्तेची आणि माशांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने सूचना करणार असल्याचे आश्वासन कोळी महासंघाने दिल्याची माहिती आमदार रमेश पाटील यांनी दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी