शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; जागतिक बाजारपेठेत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 2:46 PM

महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी उच्चस्तरावर हालचाली सुरू आहेत. खाद्यवस्तूंच्या दरावर लक्ष ठेवणाऱ्या समितीने प्रत्येक उत्पादनाबाबत बैठक घेतली आहे

नवी दिल्ली – रशिया-यूक्रेन युद्धाला आता ३ महिन्यांहून अधिक काळ उलटत आला त्यामुळे त्याचे परिणाम जगभरात होत असल्याचं दिसून येत आहे. जगात अन्न संकट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशात घरगुती वापरासाठी मिळणाऱ्या खाद्य वस्तू आवश्यक साठा नसल्याने निर्यातीवर बंदी आणली जात आहे. गहू, साखर निर्यातीवर भारताने बंदी आणली आहे. आता केंद्र सरकार तांदूळ निर्यातीवर बंदी (Rice Export Ban) आणण्याची तयारी करत असल्याचं सांगितले जात आहे.

पंतप्रधान कार्यालय घरगुती खाद्य वस्तूच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी पाऊल उचलत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ५ गरजेच्या वस्तू निर्यात करण्यावर रोख आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. यातील यादीत गहू, साखरेच्या निर्यातीवर आधीच बंदी आणली आहे. आता येणाऱ्या काळात तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याचा विचार सुरू आहे. बासमती तांदूळ वगळता इतर तांदूळ निर्यात होणार नाहीत. गहू आणि साखरेप्रमाणेच तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याची शक्यता आहे.

ईटी रिपोर्टनुसार, महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी उच्चस्तरावर हालचाली सुरू आहेत. खाद्यवस्तूंच्या दरावर लक्ष ठेवणाऱ्या समितीने प्रत्येक उत्पादनाबाबत बैठक घेतली आहे. दर नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावं लागेल यावर विचार विनिमय सुरू आहे. यात साखरेसोबत तांदूळ निर्यातबंदी आणली जाऊ शकते असं सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे. सरकारने साखरेच्या निर्यातीवर २० लाख टन मर्यादा आखून दिली आहे.

तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार भारत

भारत जगातील तांदूळ निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तांदूळ निर्यातीत भारतापुढे चीन आहे. भारताने २०२१-२२ मध्ये १५० हून जास्त देशांना तांदूळ निर्यात केला आहे. त्यात भारताने विना बासमती तांदूळ निर्यातीवर सर्वात जास्त परदेशी चलन कमाई केली. बहुतांश देश धान्य निर्यातीबाबत इनवार्ड पॉलिसी अंमलात आणत आहेत. भारतही तेच करत आहे. आधी देशातंर्गत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या जातील. त्यानंतर तांदूळ निर्यात केले जाईल हे खरेच आवश्यक आहे. त्यामुळे लवकरच केंद्र सरकार तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याची शक्यता आहे.