शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
3
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
4
आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याला गेले; हा एकच किस्सा रतन टाटांच्या कामाची पद्धत सांगून जातो
5
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
6
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
7
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
8
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
9
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
10
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
12
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट
13
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्च्या देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
14
'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
15
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
16
रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."
17
Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
18
Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!
19
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
20
असा माणूस पुन्हा होणे नाही! रतन टाटांच्या निधनानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली

मोदी सरकार नरमले!

By admin | Published: March 11, 2015 2:46 AM

लोकसभेने अखेर मंगळवारी वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटवली आहे. सरकारने लोकसभेतील परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी राज्यसभेतील लढाई बाकी आहे.

नवी दिल्ली : लोकसभेने अखेर मंगळवारी वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटवली आहे. सरकारने लोकसभेतील परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी राज्यसभेतील लढाई बाकी आहे. मागे हटणार नसल्याचा घोषा लावणाऱ्या मोदी सरकारने विरोधकांच्या प्रचंड दबावासमोर झुकत ९ अधिकृत दुरुस्त्या स्वीकारल्या; तर आणखी दोन दुरुस्त्या जोडत या विधेयकाचा कायदेशीर मार्ग प्रशस्त केला. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राजद आणि बीजदने सभात्यागाचा मार्ग निवडला; तर कट्टर विरोधक असलेला रालोआतील घटक पक्ष शिवसेनेने गैरहजर राहात विरोध कायम असल्याचे दाखवून दिले. योग्य मोबदल्याचा अधिकार आणि भूसंपादनात पारदर्शकता, पुनर्वसन आणि पुनर्व्यवस्था(सुधारित) विधेयक २०१५ वर लोकसभेने आवाजी मतदानाने मंजुरी दिली. रालोआचा घटक असलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी पक्षाने आणलेली दुरुस्ती फेटाळली गेली. विरोध आणि विविध पातळीवरील सल्लामसलत लक्षात घेऊन सरकारने ज्या नऊ दुरुस्त्या स्वत:हून ज्या नऊ दुरुस्त्या मांडल्या त्या तुलनेने जुजबी आहेत. ७० टक्के भूमीधारकांची संमती असेल तरच जमीन संपादित करता येईल व ‘सोशल इन्पॅक्ट अ‍ॅसेसमंट’ केल्यशिवाय जमीन घेता येमार नाही, ही आधीच्या कायद्यातील बगळण्यात आलेली बंधने पुन्हा अंतर्भूत करावीत, ही विरोधकांची प्रमुख मागणी मात्र सरकारने मान्य केली नाही. तसेच हे विधेयक सविस्तर विश्लेषणासाठी प्रवर समितीकडे पाठविणेही सरकारला मान्य झाले नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मित्र पक्ष आणि विरोधकांना सोबत घेऊन जाण्याचे संकेत दिले होते. संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडूंनी सोमवारी नरमाईची भूमिका अवलंबली होती, त्याची परिणती दिसून आली.राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्गाच्या दुतर्फा एक कि.मी.पर्यंत औद्योगिक कॉरिडॉर सिमित ठेवण्यासह भूमीहीन शेतमजूरांच्या झळ पाहोचणाऱ्या कुटुंबांना अनिवार्य रोजगार, जिल्हा स्तरावर तक्रारींचा निपटारा आणि निवाडा, कमीत कमी जमीन अधिग्रहण यासारख्या ११ अधिकृत सुधारणा मंजूर करणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली, नायडू, ग्रामीण विकास मंत्री चौधरी वीरेंद्रसिंग यांनी भूसंपादन विधेयकावर विरोधी पक्षांशी चर्चा घडवून मन वळविण्याचे प्रयत्न चालविले होते. विरोधकांच्या चिंता दूर करण्यावर भर देत या विधेयकात सुधाराण घडवून आणणार असल्याचे वीरेंद्रसिंग यांनी स्पष्ट केले आहे.सरकारने प्रारंभी नऊ दुरुस्त्यांची यादी जारी केली असून विधेयकाच्या त्यानुसार बदल करणार असल्याचे नमूद केले आहे. तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी एक यंत्रणा अस्तित्वात आणण्यासह सार्वजनिक- खासगी सहभागातील सामाजिक पायाभूत प्रकल्पांसाठी देण्यात आलेली सवलत हटविण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे. मूळ कायद्यात अशा प्रकल्पांसाठी ताब्यात घेतल्या जाणाऱ्या जमिनीसाठी किमान ७० टक्के जमीन मालकांची सहमती अनिवार्य केली होती. त्यासह विरोधकांनी काही सुधारणा सूचविल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)