शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लॉकडाऊनमध्ये परतलेल्या मजुरांच्या मदतीसाठी मोदी सरकार एका योजनेच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 14:54 IST

देशातील ११६ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मजूर आपल्या गावी परतल्याची माहिती मिळते. यामध्ये सर्वाधिक बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिसा आणि राजस्थान या राज्यांतील आहेत.

ठळक मुद्देसर्व जिल्ह्यांत परत आलेल्या मजुरांचा डाटा सरकारने तयार केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात किती मजूर परत आले आहेत. याविषयीची सरकारने माहिती गोळा केली आहे.

नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे शहरांतून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर आपल्या-आपल्या गावी परतले आहेत. या मजुरांसाठी सरकार आता एक मोठी योजना आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने दोन आठवड्यांत सर्व मंत्रालयांकडून प्रस्ताव मागितला आहे. देशातील ११६ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मजूर आपल्या गावी परतल्याची माहिती मिळते. यामध्ये सर्वाधिक बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिसा आणि राजस्थान या राज्यांतील आहेत.

केंद्र सरकारने निवडलेल्या ११६ जिल्ह्यांपैकी बिहारमध्ये सर्वाधिक ३२ जिल्हे आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशातील ३१ जिल्हे, मध्य प्रदेशातील २४ जिल्हे, राजस्थानातील २२ जिल्हे, झारखंडचे ३ जिल्हे आणि ओडिसामधील ४ जिल्हे आहेत. लॉकडाऊनमुळे या जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांना रोजगार मिळाला नाही.

सरकारच्या या योजनेंतर्गत कोरोना लॉकडाऊन दरम्यान आपल्या राज्यांत व गावात परतलेल्या मजुरांचे पुनर्वसन व रोजगारासाठी या ११६ जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारच्या समाजकल्याण आणि थेट लाभ योजना, या जलद मिशन मोडमध्ये चालविल्या जाणार आहेत. गावांमध्ये परतलेल्या मजुरांना रोजगार आणि आणि गरीब कल्याण सुविधांचा लाभ मिळवून देणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

या जिल्ह्यांमध्ये मनरेगा, जनधन योजना, किसान कल्याण योजना, अन्न सुरक्षा योजना, पंतप्रधान आवास योजना, कौशल्य विकास यांसारख्या इतर केंद्रीय योजनांतर्गत मिशन मोडमध्ये कार्य केले जाणार आहे. यासह, नुकत्याच जाहीर झालेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच अन्य केंद्रीय योजनाही योग्य पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे समजते.

सर्व जिल्ह्यांत परत आलेल्या मजुरांचा डाटा सरकारने तयार केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात किती मजूर परत आले आहेत. याविषयीची सरकारने माहिती गोळा केली आहे. उत्तरप्रदेशाच्या सिद्धार्थनगर आणि बिहारच्या पूर्व चंपारणमध्ये सर्वाधिक दीड लाखाहून अधिक मजूर परत आले आहेत.

बिहारच्या आठ जिल्ह्यांत एक लाखाहून अधिक मजूर परत आले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील दोन, मध्य प्रदेश व ओडिसामधील प्रत्येकी एक आणि राजस्थानमधील तीन जिल्ह्यांमध्ये एक लाखाहून अधिक मजूर परतले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारीNarendra Modiनरेंद्र मोदी