शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मोदी सरकार दिल्ली सरकारला निष्क्रिय करु पाहतेय - केजरीवाल

By admin | Published: January 15, 2016 6:06 PM

मोदी सरकार विरोधात आज केजरीवाल यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. मोदी सरकार दिल्ली सरकारला निष्क्रिय करु पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १५ - मोदी सरकार विरोधात आज केजरीवाल यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. मोदी सरकार दिल्ली सरकारला निष्क्रिय करु पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम आदमी पार्टीला निष्क्रिय करण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न आहे, पण तो कधीच यशस्वी होऊ देणार नाही असेही ते म्हणाले. अण्णा हजारे आंदोलनाच्या वेळे पासून माझ्याविरोधात वेगवेगळे कट रचले जात आहेत, असे ते म्हणाले. दिल्लीत प्रदुषण कमी करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ऑड-ईव्हन योजनेच्या समारोपाच्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. सरकार चालवण्यासाठी पारदर्शकता आणि खरेपणा ही माझी प्रमुख अस्त्रं असल्याचं त्यांनी सांगितले.केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अलिकडेच केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर छापा टाकला होता. त्या दिवसाला केजरीवाल यांनी काळा दिवस असे संबोधत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरुद्ध मोदी यांनी कारवाई करण्याची हिंमत दाखवावी असे म्हणत टीका केली.पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांकडून समजले की मनिष किंवा सतींदर यांच्यावर पुढील छापा पडणार आहे. त्यांच्याकडील अधिकाऱ्यांवर काहीतरी चूक करण्यासाठी दबाव आणण्यात येत आहे, असा खळबळजनक आरोप केजरीवाल यांनी ट्विटद्वारे केला आहे. तसेच तुम्ही काहिही करा मोदीजी आमच्यासोबत सत्य आणि देव आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे आम्हाला धोका पोचवू शकत नाही असे दुसऱ्या एका ट्विटद्वारे केजरीवालांनी म्हटले आहे.