शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

मोदी सरकारला हटवा मगच पाकसोबत संबंध सुधारतील - मणिशंकर अय्यर

By admin | Published: November 17, 2015 12:06 PM

भारतातून नरेंद्र मोदी सरकार हटवण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

कराची, दि. १७ -  भारतातून नरेंद्र मोदी सरकार हटवा, आम्हाला आणा मगच पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारतील असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे. मणिशंकर यांच्या विधानाने आता वाद निर्माण झाला असून यामुळे काँग्रेस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी १० दिवसांपूर्वी पाकिस्तानी वृृत्तवाहिनी दुनिया टीव्हीवरील चर्चासत्रात सहभाग घेतला. या चर्चासत्रात मणिशंकर अय्यर, सुधींद्र कुलकर्णी आदी मंडळी उपस्थित होती. भारत - पाक संबंधांमध्ये सुधारणा कशी होईल असा सवाल चर्चासत्रात उपस्थित होताच अय्यर म्हणाले, यांना हटवा आणि आम्हाला आणा. यावर मुलाखतकर्त्याने 'हे काम तुम्हीदेखील करु शकता' असे सांगितले असता आम्ही मोदी सरकारला हटवणारच असे त्यांनी नमूद केले.पाकिस्तान हा लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीच्या प्रचाराचा मुद्दा नव्हता, सबका साथ सबका विकास या भूमिकेमुळेच मोदी सरकार सत्तेवर आले असे अय्यर यांनी म्हटले आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यासाठी भारतात मनमोहन सिंग तर पाकमध्ये परवेझ मुशर्रफ यांच्यासारखे नेतृत्व गरजेचे आहे असा दावाही त्यांनी केला.

मोदी सरकारच्या पाक धोरणावर सुधींद्र कुलकर्णी यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. 'मोदींना पाकसोबत चांगले संबंध हवेत, पण ते काही अटीशर्ती टाकत आहेत. यामुळे चर्चाच सुरु नाही झाली व हे चुकीचे आहे' असे कुलकर्णी यांनी सांगितले.  यापूर्वी सलमान खुर्शीद यांनी पाकमध्ये जाऊन मोदी सरकारवर टीका केली होती तर नवाझ शरीफ यांचे कौतुक केले होते.