शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लक्ष वळविण्याची मोदी सरकारची चाल, भाजपावर कॉंग्रेसकडून दडपशाहीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:39 IST

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना बुधवारी सीबीआयने केलेली अटक हा केवळ सूडाच्या राजकारणाचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार स्वत:च्या भ्रष्ट कारभारावरील लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हे जाणीवपूर्वक करीत आहे, असा आरोप बुधवारी काँग्रेसकडून करण्यात आला.

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना बुधवारी सीबीआयने केलेली अटक हा केवळ सूडाच्या राजकारणाचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार स्वत:च्या भ्रष्ट कारभारावरील लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हे जाणीवपूर्वक करीत आहे, असा आरोप बुधवारी काँग्रेसकडून करण्यात आला.काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, कार्ती यांना आयएनक्स मीडिया कंपनीला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन बोर्ड (एफआयपीबी) कडून मिळालेल्या मंजुरीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक केली आहे. कार्ती हे काही नीरव मोदी वा चोकसीसारखे पळून जाणारे नव्हते. किंबहुना ते परदेशातून परत आले होते. मोदी-चोकसीच्या पलायनाला मदत करायची आणि राजकीय विरोधकांना त्रास द्यायचा, असे मोदी सरकारचे राजकारण आहे.परंतु काँग्रेस पक्ष या कारवाईमुळे नाउमेद होणार नाही. या प्रकरणातील सत्य लवकर जनतेसमोर मांडले जाईल. कार्ती यांच्यावर केलेली कारवाई हे फक्त सूडाचे राजकारण आहे, असेही त्यांनी सांगितले.मोदी सरकारच भ्रष्ट : नीरव मोदी, मेहुल चोकसी, द्वारकादास सेठ ज्वेलर्स आदी प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. त्यातून मोदी सरकारचा भ्रष्ट कारभार उघडा पडत आहे. यावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी मोदी सरकारने ही चाल खेळली आहे, असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप सरकार असे दडपशाहीचे राजकारण नेहमी करीत आले आहे, असाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Karti Chidambaramकार्ती चिदंबरमcongressकाँग्रेसBJPभाजपा