शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

संघाच्या अजेंड्याच्या दिशेने मोदी सरकारचे मार्गक्रमण

By admin | Published: July 13, 2016 2:56 AM

रा.स्व. संघाच्या मूळ अजेंड्याच्या दिशेने हळूहळू का होईना, मोदी सरकारचे मार्गक्रमण सुरू झाले आहे. समान नागरी कायद्याबाबत देश लगेच सहमत होणार नसला

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीरा.स्व. संघाच्या मूळ अजेंड्याच्या दिशेने हळूहळू का होईना, मोदी सरकारचे मार्गक्रमण सुरू झाले आहे. समान नागरी कायद्याबाबत देश लगेच सहमत होणार नसला, तरी सरकारने या विषयाबाबत किमान दोन पावले पुढे टाकण्याचे धाडस दाखवले आहे. गोरक्षा व गोवंश संरक्षणाबाबतही सरकारची भूमिका संघाच्या विचारसरणीला पूरकच ठरली आहे. सुब्रमण्यम स्वामींचे स्वयंघोषित प्रयत्न वगळता, राम जन्मभूमीबाबत सरकारने सावध पवित्रा स्वीकारला आहे. अशा वादग्रस्त विषयांच्या निराकरणास थोडा वेळ लागतो, याची संघाला कल्पना आहे. राज्यघटनेतला अनुच्छेद ३७0 रद्द करण्याबाबत सरकार आणि संघाचा विचार तूर्त समान पातळीवर आहे. संघ आणि सरकारमध्येमतभेद असल्याची चर्चा अधूनमधून ऐकायला मिळते. तथापि, गेल्या २ वर्षांत संघ व सरकारच्या भूमिकेत टोकाचा संघर्ष उद्भवल्याची फारशी उदाहरणे नाहीत. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत संघाचे स्वयंसेवक फारसे सक्रिय नव्हते. बिहार निवडणुकीच्या ऐन तोंडावर सरसंघचालक मोहनराव भागवतांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वादग्रस्त विधानांचा दुष्परिणाम भाजपाला भोगावा लागला. थेट परदेशी गुंतवणूक, तसेच भू-संपादन विधेयकाबाबत सरकार आणि संघपरिवाराच्या भूमिकेत बरीच तफावत आहे, अशी उदाहरणे दिली जात असली, तरी सरकारच्या कामकाजात संघाने गैरवाजवी हस्तक्षेप केलेला नाही. अनेक मुद्द्यांबाबत सरकार आणि संघ यांच्यात तफावत असल्याचे चित्र जाणीवपूर्वक दाखवले जाते. कारण विरोधकांची स्पेस संघ भरून काढू इच्छितो. तथापि, आपला मूळ अजेंडा लागू करण्याच्या प्रयत्नात सरकार अडचणीत येऊ नये, या बाबतीत संघ कमालीचा दक्ष आहे. स्मृती इराणींचे मनुष्यबळ विकास खाते रा.स्व.संघाच्या सूचनेनुसार बदलण्यात आले, अशी चर्चा होत असली, तरी संघाशी सर्वाधिक जवळीक असलेल्या रामशंकर कथेरियांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र का मिळाला? असा प्रश्नही या निमित्ताने आपसूकच उपस्थित होतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)